
फोटो सौजन्य- pinterest
हनुमान यांना शेंदूर लावण्याची प्रथा महत्त्वाची मानली जाते. हनुमानाला शेंदुर लावण्याचा संबंध रामायणाशी संबंधित आहे. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर लावण्याची परंपरा चालत आलेली आहे. हनुमानाला शेंदूर लावण्यामागे धार्मिक महत्त्व देखील आहे. शेंदूर हा ऊर्जा, शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. मंगळवार आणि शनिवार या दिवशी शेंदूर लावणे विशेष शुभ मानले जाते. हनुमानाच्या मूर्तीला शेंदुर लावला जातो. हा शेंदुर का लावला जातो याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? हनुमानाला शेंदुर लावण्यामागे एक सुंदर कथा आहे. हनुमानाला शेंदुर लावण्यामागील कथा काय आहे ते जाणून घेऊया
रामायणानुसार, एकदा हनुमान यांनी पाहिलं की सीता आपल्या कपाळावरती सिंदूर लावत आहे. तेव्हा हनुमानाने त्यांना विचारलं हे माते तुम्ही हे सिंदूर का लावताय. सीतेने उत्तर दिलं की, मी हे सिंदूर माझा पती राम यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या मांगल्यासाठी लावते आहे हे ऐकून हनुमान खूपच प्रभावी झाले त्यांच्या मनात विचार आला. जर थोडंस सिंदूर लावल्याने प्रभू रामाचं कल्याण होतयं तर मी माझ्या संपूर्ण शरीरावर सिंदूर लावलं तर त्यांच्या आयुष्याला आणि सुखाला किती लाभ होईल. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावरती हा सिंदूर लावला. त्यांच्या या अतूट भक्तीमुळेच श्रीराम त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद देखील दिला. सिंदूर अर्थातच पुढे झालेला शेंदूर हा भक्ती, त्याग आणि निस्वार्थ प्रेम याचं प्रतीक आहे.
हनुमानाची रामावरती अखंड श्रद्धा हे शेंदूर दर्शवतं. म्हणून आजही मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावलं जातं. विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हनुमाना शेंदूर लावतात. यामुळे संकटं दूर होतात आणि शक्ती मिळते, असे मानले जाते. हनुमानाने प्रभू रामावरील अपार प्रेम आणि भक्ती दाखवण्यासाठी संपूर्ण शरीरावरती शेंदूर लावला म्हणून आजही त्यांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे.
हनुमानाची ही अतूट भक्ती पाहून श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानाला आशीर्वाद दिला की, जो कोणी तुला शेंदूर अर्पण करेल, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि त्याला बल, बुद्धी आणि यश प्राप्त होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हनुमान यांनी प्रभू श्रीराम यांच्या कल्याणासाठी संपूर्ण शरीरावर शेंदूर लावला, त्यामुळे ही परंपरा सुरू झाली.
Ans: शेंदूर शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे, भक्ती आणि समर्पण दर्शवतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो, अशी श्रद्धा आहे
Ans: ही प्रथा निःस्वार्थ प्रेम, त्याग आणि पूर्ण भक्तीचे प्रतीक आहे.