Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Day 2025:आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयुष्य सुखकर करण्यासाठी मात्र…; काय म्हणाल्या अंजली देशमुख?

कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. शिक्षण, संगणक प्रोग्रामिंग, वैद्यकीय तपासणी, निसर्ग निरीक्षण, छायाचित्रण, चित्रकला, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2025 | 02:06 PM
AI Day 2025:आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयुष्य सुखकर करण्यासाठी मात्र...; काय म्हणाल्या अंजली देशमुख?

AI Day 2025:आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयुष्य सुखकर करण्यासाठी मात्र...; काय म्हणाल्या अंजली देशमुख?

Follow Us
Close
Follow Us:

प्रगती करंबेळकर/ वैष्णवी सुळके:  कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी क्षमतेचा पर्याय नसून मानवी बुद्धीमत्तेने विकसित केलेले एक मानव उपयोगी तंत्रज्ञान आहे. ज्याचा योग्य वापर केल्यास आयुष्य अधिक सोयीचे आणि सुखकर होते. मात्र, त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, असे मत कमिन्स कॉलेजच्या ऑफ इंजिनियरिंगच्या कम्पुटर विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक अंजली देशमुख यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिनानिमित्ताने व्यक्त केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिनानिमित्त ‘नवराष्ट्रने अंजली देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या जगात तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॅलक्युलेटर आणि संगणक आले तेव्हाही लोकांमध्ये भीती होती की माणसाची कामे बंद होतील, नोकऱ्या जातील, पण तसे झाले नाही. तंत्रज्ञानाने मानवी क्षमतेला अधिक बळकटी दिली. त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ताही माणसाचा शत्रू नाही, ती त्याची सोबती आहे. मात्र त्याचा योग्य व प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. शिक्षण, संगणक प्रोग्रामिंग, वैद्यकीय तपासणी, निसर्ग निरीक्षण, छायाचित्रण, चित्रकला, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होत आहे. कोडिंगसारख्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने गती येते. आजारांचे निदान करणाऱ्या प्रणालींपासून दिव्यागांच्या सोयीसुविधांपर्यंत याचा वापर होतो. माहिती सहज, जलद आणि अचूक मिळवण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरते.

अजूनही अशी अनेक साधने आहेत, जी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. छायाचित्रण व रेखाचित्रांसाठी मिडजर्नीसारखी आधुनिक साधने अजूनही मर्यादित लोकांपर्यंतच आहेत. तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जेणेकरून गावागावात आणि सर्व स्तरांवर त्याचा लाभ घेता येईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता शिकण्यासाठी आज अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये ‘एनपीटीईएल’ या अभ्यासक्रमांतर्गत कोर्सेस घेण्यात येतात. तेथे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ती कशी कार्य करते, तिचा योग्य उपयोग कसा करता येईल, याचे शिक्षण दिले जाते. याशिवाय अनेक ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम आणि विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे मानवी विचारशक्ती खुंटित होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. माणूसच तंत्रज्ञानाला दिशा देतो, त्यामुळे तंत्रज्ञानावर पूर्ण अवलंबून राहून आपली विवेकबुद्धी हरवू नये. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी मानवी संवेदनशीलता, अनुभव आणि निर्णयक्षमता ती गाठू शकत नाही. त्यामुळेच तिचा उपयोग आपली क्षमता वाढवण्यासाठी, कामे सुलभ करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी करावा.

शासनानेही या क्षेत्रासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. परदेशात जसे सुरक्षा आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण करणारे कायदे आहेत, तसेच कायदे भारतातही काही प्रमाणात याबाबतचे कायदे आहेत परंतू यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखता येईल आणि बौद्धिक संपदेचा प्रभावी वापर करता येईल.

Web Title: Artificial inteligence day 2025 life easy chatgpt anjali deshmukh navarashtra special pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
1

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?
2

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
3

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…
4

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.