Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Statehood Day: देशाला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्ष गुलामगिरी सहन केली; स्वतंत्र गोव्याचा ‘असा’ आहे रक्तरंजित इतिहास

1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण गोवा मात्र तरीही पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. खरंतर गुलामगिरीच्या वागणूकीचे चटके नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने पुरेपुर सहन केले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 30, 2025 | 06:08 PM
Goa Statehood Day: देशाला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्ष गुलामगिरी सहन केली; स्वतंत्र गोव्याचा असा आहे रक्तरंजित इतिहास

Goa Statehood Day: देशाला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्ष गुलामगिरी सहन केली; स्वतंत्र गोव्याचा असा आहे रक्तरंजित इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

“येवा कोकण आपलाच आसा” असं म्हणणारी कोकणची माणसं ही शहाळ्यासारखी मधूर असतातात हे कायमच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी अनुभवलेलं आहे. कोण्या एके काळी याच कोकणाचा गोवा देखील अविभाज्य भाग होता. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण गोवा मात्र तरीही पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. खरंतर गुलामगिरीची वागणूकीच्या चटके नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने पुरेपुर सहन केले होते. याच कारणाने पारतंत्र्यात न राहता आणि अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारण्याचं सामर्थ्य असण्यास गोवेकर अपवाद नव्हते. 1947 च्या स्वातंत्र्यानंतर ही तब्बल 14 वर्षांच्या संघर्षाने गोव्याने पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळालं . त्यानंतर गोव्याला राज्याच्या दर्जा प्राप्त झाला आणि तो दिवस म्हणजे 30 मे 1987.

काय आहे गोव्याचा इतिहास ?

पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजे 19 डिसेंबर 1961 या दिवशी भारताने पोर्तुगीज सत्तेपासून गोव्याची मुक्तता केली त्यामुळे हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन विजय’द्वारे गोवा मुक्त झाला. आणि हीच गोव्याच्या स्वातंत्र्याची नांदी ठरली.

इतिहासातील नोंदी प्रमाणे 1498 साली पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ हा गोव्यात दाखल होणारा पहिला पोर्गुगीज होता. व्यापारासाठी आलेल्या या पोर्तुगीजांनी हळूहळू सागरी प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला, जिथे समुद्र तो प्रदेश म्हणजे पोर्कुगीजांची सत्ता हे समीकरणच बनलं होतं आणि यामध्ये पोर्गुगीजांची सर्वात प्रबळ सत्ता होती ती गोव्यात. ही सत्ता इतकी बळावली होती की, पोर्तगीजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गोवा राज्याला1947च्या स्वातंत्र्यानंतर ही पुढे 14 वर्ष संघर्ष करावा लागला होता. या गोवा मुक्तीसंग्रामात फक्त गोव्याचे नागरिक किंवा समाजसुधारक इतके नव्हते तर या मोलाच्य़ा कामगिरीत शाहिरांचं देखील तितकंच योगदान होतं. गोवा मुक्तीसाठी जी चळवळ उभी राहिली होती त्या चळवळीत लोकशाहीर कृष्णराव गणपत साबळे यांचा देखील सक्रीय सहभाग होता.

देशाच्या स्वातंत्र्याचा सखोल अभ्य़ास केल्यास असं लक्षात येतं की, संपूर्ण देशावर ब्रिटीशांचं राज्य होतं आणि गोवा प्रदेशावर पोर्तुगीज म्हणूनच1947 चं स्वातंत्र्य देशाला मिळालं ते ब्रिटीश राजवटीपासून. मात्र पोर्तुगीजांचं वास्तव्य गोव्यात भक्कम हे होतंच. खरंतर गोवा आणि हैदराबाद मुक्तीचा संग्राम यशस्वी झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गोवा मुक्त व्हावा यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांची बाजी लावली. गोवा मुक्तीला हा वणवा पेटून उठला ते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे. डॉ. राम मनोहर यांच्या मित्राने त्यांना गोव्यात काही दिवस विश्रांतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळी पोर्तुगीजांनी सामान्य जनतेवर लादलेली अमानुष निर्बंध आणि पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळलेली जनता पाहून गोवा मुक्तीची ती पहिली ठिणगी पेटली होती. पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा यात सहभाग होता.

स्वतंत्र गोव्याचा ‘असा’ झाला सूर्योदय

पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून नामशेष झाल्यानंतर गोवा, दिव-दमण आणि अंदमान प्रमाणे केंद्रशासीत प्रदेश व्हावा अशा आशयाचे वारे वाहू लागले. मात्र गोव्यातील नागरिकांना हे मान्य नव्हते. गोव्याला स्वत:ची भाषा, लोकजीवन आणि विशिष्ट संस्कृती आहे जी गोव्याला वेगळी ओळख देते. हीच बाब लक्षात घेत 30 मे 1987 रोजी भारत सरकारकडून गोवा केंद्रशासित प्रदेशातून वगळण्यातत आला आणि स्वतंत्र्य गोव्याचा खऱ्या सूर्य़ोदय झाला तो 30 मे 1987 रोजी. याच दिवशी गोवा स्वतंत्र्य राज्य म्हणून घोषित झालं. त्यामुळे 30 मे हा दिवस गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

 

Web Title: Goa statehood day even after the country gained independence the bloody history of independent goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Goa
  • India History
  • Navrashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.