Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकार घुसखोरांची गय करणार नाही

आता भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रितसर नोंदणी होणार आहे. अशा व्यक्तींवर सरकारची करडी नजर असणार आहे. भारत सरकारने याबाबत निर्धारपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे पण केंद्राला राज्यांचे सहकार्य असणे आवश्यक आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2025 | 02:54 PM
dunki (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

dunki (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

नवी स्थलांतराची प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरू झाली असून, जागतिकीकरणानंतर त्यास वेग आला आहे. मायदेश सोडून अन्यत्र स्थायिक होऊ पाहणाऱ्यांचे प्रमाण अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. दरवर्षी विविध देशांतील सुमारे ५० हजार लोक अन्य देशांत जाऊन स्थायिक होतात; मात्र त्यातील ९५ टक्के संख्या ही विकसनशील देशांतून विकसित देशांत स्थलांतर करणाऱ्यांची असते. सुमारे तीन कोटी भारतीय १८९ देशांत स्थलांतरित झाले आहेत.

India’s foreign Debt: चिंताजनक! १० वर्षांत भारतावर तब्बल २१६ लाख कोटींचे कर्ज

जगभरातून संपत्ती कमवून मायदेशात पैसे पाठवणाऱ्यांमध्येही सर्वाधिक संख्या भारतीयांचीच आहे. त्यांच्याकडून वर्षाला ७५ अब्ज डॉलर इतकी संपत्ती भारतात येते; मात्र अमेरिकेसारख्या देशात बेकायदेशीररीत्या काही भारतीय राहिले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची हकालपट्टी केली, तेव्हा त्यास भारताने आक्षेप घेतला नाही. त्या त्या देशाचे कायदे मोडणाऱ्यांचे आम्ही समर्थन करत नाही, ही मोदी सरकारची सुस्पष्ट भूमिका आहे. त्याच धर्तीवर अन्य देशांतून भारतात येणाऱ्यांबाबतही सरकारचे धोरण आहे. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या विदेशी लोकांचे स्वागतच केले जाईल; मात्र सुरक्षेला धोका ठरणाऱ्यांना इथे राहू दिले जाणार नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

यांनी यासंदर्भाने लोकसभेत देत धोरण स्पष्ट केले. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असा गलथानपणा काँग्रेसच्या राजवटीत झाला; पण आम्ही असे होऊ देणार नाही, हे कोणीतरी सांगणे गरजेचे होते. अवैध कागदपत्रांसह भारतात वास्तव्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकार घुसखोरांची गय करणार नाही, असे शहा यांनी बजावताना देशाच्या भविष्यकालीन कठोर धोरणाचे संकेत दिले. भारत-बांगलादेशमधील दोन हजार किलोमीटरच्या सीमेपैकी ४५० किलोमीटरवर कुंपण घालण्याचे काम झाले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने बांगला देशी घुसखोरांना अभय दिले आहे. त्यांच्याकडे बनावट कागद आढळलेली आहेत, असा केंद्र सरकारचा आरोप आहे. आता केंद्राने स्थलांतर व विदेशी नागरिकांसंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडले असून, ते आवाजी मतदानाने मंजूरही करण्यात आले. देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उत्पादन व व्यापाराला चालना आणि विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सदर विधेयक आवश्यक असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी ब्रिटिश काळात स्थलांतर व विदेशी नागरिकांसंदर्भात १९२०, १९३९ व १९४६ अशी तीन विधेयके संमत केली गेली; पण बदलत्या संदर्भात नवीन आणि कडक कायदा करण्याची गरज होतीच. या विधेयकानुसार, भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा देश सोडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसाचा वापर करताना आढळल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एवढी कडक शिक्षा असल्यामुळे भारतात बेकायदेशीररीत्या भारतात रहिवास करणाऱ्यांवर वचक बसेल. हॉटेल, शैक्षणिक संस्था व रुग्णालयांमधील विदेशी नागरिकांविषयी माहितीचा अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

Web Title: The central government will not tolerate infiltrators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Central government
  • india

संबंधित बातम्या

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार
1

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
2

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
3

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.