Jaishankar and Manturov signed the IRIGC-TEC protocol details await release
IRIGC-TEC Protocol Signature : जागतिक राजकारणात आज वादळ उसळले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीसाठी २५ टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली असतानाच, भारत आणि रशिया यांनी मोठा आर्थिक-ऊर्जा करार केला आहे. यामुळे आशिया खंडात आणि विशेषतः जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठा उलथापालथ होणार हे निश्चित मानले जाते.
२१ ऑगस्ट २०२५ रोजी मॉस्को येथे झालेल्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) २६ व्या सत्रात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी महत्त्वपूर्ण प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार केवळ तेल-ऊर्जेपुरता मर्यादित नसून व्यापार, उद्योग, अणुऊर्जा, संस्कृती आणि कौशल्यविकास अशा विविध क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे.
मंटुरोव्ह यांनी स्पष्ट केले की रशिया भारताला कच्चे तेल, तेलजन्य पदार्थ, थर्मल इंधन आणि कोळसा यांचा पुरवठा सुरू ठेवेल. याशिवाय, द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) निर्यातीची क्षमता देखील रशियाला दिसत आहे. जागतिक पातळीवर LNG साठे आणि पुरवठा अत्यंत महत्त्वाचा ठरत असताना, रशियाकडून भारताकडे LNG वाहून नेण्याची शक्यता भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने दिलेल्या करार शुल्काच्या धमकीनंतर भारताने रशियासोबत करार करून जगाला ठाम संदेश दिला आहे की, भारत आपले राष्ट्रीय हित पाहून निर्णय घेईल आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हे भारत-रशिया सहकार्याचे यशस्वी उदाहरण मानले जाते. या अनुभवाच्या आधारे, शांततापूर्ण अणुक्षेत्रात आणखी सहकार्य करण्याची अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे. भारतासाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने हे सहकार्य फार महत्त्वाचे ठरणार आहे.
Speaking at the India-Russia Business Forum in Moscow.
🇮🇳 🇷🇺
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 20, 2025
credit : social media
भारत-रशिया संबंध फक्त ऊर्जा व अणुऊर्जेतच मर्यादित नाहीत. व्यापार, शेती, कौशल्यविकास, शिक्षण, संस्कृती आणि गतिशीलता या सर्व क्षेत्रांमध्येही या दोन्ही देशांनी सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, आज ९० टक्क्यांहून अधिक व्यवहार भारत-रशिया यांनी राष्ट्रीय चलनांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी होत असून जागतिक व्यापाराच्या समीकरणात मोठा बदल होत आहे.
जयशंकर यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावर लिहिले की, “आजची IRIGC-TEC बैठक केवळ व्यवहारापुरती मर्यादित नाही; ती भारत-रशियाच्या दशकांपासून टिकून असलेल्या विश्वास व भागीदारीला पुढे नेणारी ठरेल. आगामी वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक निर्णायक ठरेल, असा मला विश्वास आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
भारत-रशियाच्या या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पश्चिम देशांचा दबाव असतानाही भारताने स्वावलंबी आणि बहुपक्षीय परराष्ट्र धोरणाचा ठोस दाखला दिला आहे. अमेरिका आणि युरोपियन संघाने लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून भारताने आपले हित जपले, तर रशियालाही आशियाई बाजारपेठेत अधिक बळकट पाय रोवण्याची संधी मिळाली. आता आगामी काही महिन्यांत या कराराचे तपशील दोन्ही सरकारे जाहीर करतील. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा आणि व्यापार भागीदारी ही फक्त द्विपक्षीय संबंधापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगातील भू-राजकीय घडामोडींवर परिणाम घडवणारी ठरेल.