Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

शहरी विस्तारामुळे शहरातील हिरवे पट्टे आणि जंगल झपाट्याने कमी होत आहेत. मोठमोठे रस्ते, मॉल्स आणि गाळाचे रेसिडेन्शियल प्रकल्प निसर्गाला नुकसान पोहोचवत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2025 | 02:35 AM
Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे/पुणे: पुणे शहर आणि आजूबाजूच्या उपनगरात वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे निसर्गाच्या नैसर्गिक संतुलनाला धक्का बसतो आहे. पर्यावरण तज्ञांच्या म्हणण्यानुसार आर्थिक प्रगतीला प्राधान्य देताना आपण पर्यावरणीय सीमा ओलांडत आहोत. शाश्वत विकास आणि पर्यावरण हे हातात हात घालून चालायला हवे, पण सध्या नेमके उलट दिशेने आपण जात आहोत. शहरांची उंची आणि रुंदी दोन्ही वाढत असताना निसर्गाची परिस्थिती मात्र अधिक गंभीर होत चालली आहे. वृक्षतोड, जलाशयांचे गैरव्यवस्थापन आणि प्रदूषण यामुळे नैसर्गिक पारिस्थितिकी संकटात आहे.

बांधकामाचा धुमाकूळ

शहरी विस्तारामुळे शहरातील हिरवे पट्टे आणि जंगल झपाट्याने कमी होत आहेत. मोठमोठे रस्ते, मॉल्स आणि गाळाचे रेसिडेन्शियल प्रकल्प निसर्गाला नुकसान पोहोचवत आहेत. पावसाचे पाणी नद्या आणि तलावांपर्यंत पोहोचण्याऐवजी रस्त्यांवर वाहते, परिणामी ओला-कोरडा दुष्काळ अधिक गंभीर होत आहे. जर आपण बांधकाम आणि निसर्ग यामध्ये संतुलन ठेवले नाही, तर पाणी, माती आणि हवा हे तीनही जीवनस्रोत गंभीर संकटात येतील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

प्रदूषण आणि जैवविविधतेचा नाश 
औद्योगिक धूळ, वाहने आणि रासायनिक खतांचा अतिरेक हवेच्या गुणवत्तेला प्रभावित करतो, पाण्यातील प्रदूषण जीवसृष्टीसाठी धोकादायक ठरते. परिणामी काही पक्षी, प्राणी आणि वनस्पती विलुप्त होत आहेत. निसर्ग संवर्धन प्रमुखांच्या म्हणण्यानुसार जैवविविधतेच्या नाशाचा परिणाम केवळ निसर्गावर नाही तर आपल्या आरोग्यावरही होतो.

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

शाश्वत विकासाची गरज

शाश्वत विकास म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नाही, तर पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक न्याय आणि भविष्यातील सुरक्षितता यांचा समन्वय आहे. परंतु सध्या विकासाला प्राधान्य देताना पर्यावरण बाजूला ठेवले जात आहे.

या साठी केवळ शासनानेच नव्हे तर समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी
विविध उपाय योजना राबविण्यात येतात. त्या संदर्भात नागरिक म्हणून सजग असणे महत्वाचे आहे. वृक्षारोपण आणि हिरवळ राखणे, नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर, जलस्रोतांचे शाश्वत नियोजन, प्रदूषण नियंत्रण व कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय कायद्यांचे कडक पालन करणे इत्यादी गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे. अन्यथा या सीमोलंघनाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

पर्यावरणीय सीमोलंघन थांबवण्यासाठी विकास आणि निसर्ग यांचा समन्वय अनिवार्य आहे. आर्थिक प्रगतीसाठी निसर्गाचे बलिदान देणे आता फक्त धोकादायकच नव्हे तर शाश्वत भविष्यालाही धोका ठरणारे आहे. त्यामुळे या दसऱ्याला बाजारात जाऊन पैसे खर्च करून आणलेल्या पानांना सोने म्हणत ते लुटून कचरा करण्यापेक्षा आपट्याचे झाड लावून खऱ्या अर्थाने सीमोलंघन करता येईल.

Web Title: Urbanization and industrialization disrupt the natural balance of nature navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Dussehra
  • navarashtra special
  • Navratri 2025
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

World Steelpan Day: काय आहे स्टीलपॅन? जाणून घ्या ‘या’ अद्वितीय वाद्याचा रंजक इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि जागतिक ओळख
2

World Steelpan Day: काय आहे स्टीलपॅन? जाणून घ्या ‘या’ अद्वितीय वाद्याचा रंजक इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि जागतिक ओळख

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.