Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 21, 2025 | 07:55 PM
पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं! (Photo Credit- X)

पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • आशिया कप फायनलमधील पराभवानंतर आयुष म्हात्रेची पहिली प्रतिक्रिया
  • सांगितली पराभवाची ‘ही’ प्रमुख कारणे!
  • आता लक्ष्य अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ वर!
अंडर-19 अशिया कपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून मिळालेल्या 191 धावांच्या मोठ्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दुबईच्या मैदानावर प्रथम खराब गोलंदाजी आणि नंतर ढासळलेली फलंदाजी यामुळे भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने या मानहानीकारक पराभवामागची कारणे स्पष्ट केली आहेत.

काय म्हणाला कर्णधार आयुष म्हात्रे?

अंतिम सामन्यातील कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना आयुष म्हणाला, “नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच होता, मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. हा आमच्यासाठी एक खराब दिवस होता.” “आमच्या गोलंदाजांच्या लाईन आणि लेंथमध्ये काही त्रुटी होत्या. क्षेत्ररक्षणातही आमचा दिवस आज चांगला नव्हता, खेळाकडून अशा चुका होतात.” “आमचा प्लॅन साधा होता, ५० षटकांपर्यंत फलंदाजी करायची. पण ते आम्हाला जमले नाही. तरीही संपूर्ण स्पर्धेत मुलांनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. या स्पर्धेतून आम्ही अनेक सकारात्मक गोष्टी शिकलो आहोत.”

म्हात्रेचा स्वतःचा संघर्ष

या स्पर्धेत सलामीवीर आणि कर्णधार म्हणून आयुष म्हात्रेची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली. अंतिम सामन्यात तो केवळ २ धावा काढून बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत पाच सामने खेळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही, ज्यामुळे भारतीय डावाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. (हे देखील वाचा: IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ)

आता लक्ष्य अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ वर!

आशिया कपमधील हा कटू पराभव विसरून भारतीय संघ आता आगामी अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे.  विश्वचषकापूर्वी भारतीय संघ जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ ते ७ जानेवारी दरम्यान मालिका खेळणार आहे. १५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेतच अंडर-१९ वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंना आता आपल्या फलंदाजीतील जादू दाखवून भारताला पुन्हा एकदा विश्वविजेते बनवण्याचे आव्हान पेलवे लागणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत 26.2 षटकात 156 धावा करु शकला.

भारतीय संघाची खराब फलंदाजी

त्यानंतर, प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताच्या संघाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. वैभव सूर्यवंशी 26 धावांवर बाद झाला. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त दोन धावा करू शकला. आरोन जॉर्जने 16 धावा केल्या. विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू देखील अपयशी ठरले, ज्यामुळे भारताचा डाव फक्त 156 धावांवर संपला आणि 191 धावांनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अली रझा यांनी चार, तर मोहम्मद सय्यम आणि हुजैफा एहसान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अब्दुल सुभान यांनीही दोन विकेट घेतल्या. यासह, पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाच्या पातळीवर आशियाई विजेता बनला.

हे देखील वाचा: IND U19 vs PAK U19 : पाकिस्तानने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले; फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव

Web Title: Ayush mhatres first reaction after the defeat in the asia cup final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • Asia Cup
  • bcci
  • IND VS PAK
  • Team India

संबंधित बातम्या

IPL 2026 पूर्वी BCCI ने दोन सामन्यांचे शेड्युल केलं जाहीर, कोणते संघ येणार आमनेसामने?
1

IPL 2026 पूर्वी BCCI ने दोन सामन्यांचे शेड्युल केलं जाहीर, कोणते संघ येणार आमनेसामने?

केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला मोठा दिलासा, IPL 2026 चा वाद मिटला! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
2

केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला मोठा दिलासा, IPL 2026 चा वाद मिटला! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

BCCI New Guidelines : IPL 2026 साठी BCCI ने जारी केला नवा नियम? साडेतीन तासांचा नेमका मुद्दा काय?
3

BCCI New Guidelines : IPL 2026 साठी BCCI ने जारी केला नवा नियम? साडेतीन तासांचा नेमका मुद्दा काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.