
सुवर्णपदक विजेते रणधीर सिंग यांचे निधन
एशियन गेम्समध्ये भारतासाठी जिंकले होते सुवर्णपदक
79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली: भारतीय क्रीडा विश्वात सध्या दु:खाचे वातावरण आहे. कारण देशाचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे माजी अध्यक्ष रणधीर सिंग यांचे निधन झाले. त्यामुळे क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.
STORY | Veteran sports administrator Randhir Singh dies Veteran sports administrator and India's first shooting gold-medallist in Asian Games, Randhir Singh, died on Wednesday after battling age-related ailments. He was 79 and had undergone hospitalisation for several days… pic.twitter.com/mTkzodx3RD — Press Trust of India (@PTI_News) May 27, 2026
वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांशी झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. ते गेले अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. राजा रणधीर सिंग यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1956 मध्ये पटियालामधील एका राजघराण्यात झाला होता.
राजा रणधीर सिंग यांनी बँकॉक येथील आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई खेळांच्या इतिहासात नेमबाजीत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक होते. या एका पदकाने भारतामध्ये नेमबाजी या खेळाची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी सलग ५ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. रणधीर सिंह यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बातमी अपडेट होत आहे…