Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : अय्यरला वगळणे जिव्हारी! ‘तो त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच..’ हेड कोच Gautam Gambhir वर माजी सलामीवीराचा आरोप

आशिया कप 2025 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले आहे. यावरून भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेशने संघाच्या हेड कोच गौतम गंभीरवर आरोप लावले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 22, 2025 | 08:30 PM
Asia Cup 2025: Iyer dropped from the squad! 'He only left his favourite players out..' Former opener accuses head coach Gautam Gambhir

Asia Cup 2025: Iyer dropped from the squad! 'He only left his favourite players out..' Former opener accuses head coach Gautam Gambhir

Follow Us
Follow Us:

Asia cup 2025 : 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 या स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीचेअध्यक्ष अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून सूर्यकूमार यादवला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले तर शुभमन गिल संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारत 10 सप्टेंबरपासून यूएइविरुद्धच्या सामन्यापासून आपल्या मोहिलेमा सुरवात करणार आहे. तत्पूर्वी, संघ निवडीवरून भारतीय क्रिकेट जगतात नाराजीचा सुर दिसून येत आहे, त्याचे कारण म्हणजे आशिया कपसाठी संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे निवड समितीवर टीका होऊ लागली आहे. अशातच आता  श्रेयस आणि यशस्वी दोघांना वगळण्यात आल्याने भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेश यांच्याकडून हेड कोच गौतम गंभीर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा

नेमके आरोप काय?

भारताचा माजी सलामीवीर सदागोपन म्हणाला की, “गौतम गंभीर त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच पाठिंबा देतो, मात्र जे आवडत नाहीत त्यांना दूर ढकलतो. इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आलेली मालिका भारताने बरोबरीत सोडवली आहे. ही मोठी अचिव्हमेंट समजली जात असून त्यामागे  भारताची गेल्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी हे कारण आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी विदेशात सातत्याने कसोटी मालिका जिंकण्याची सवय लावली. आता ट्रॅक रेकॉर्ड बघता इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत सोडवणं हीच एक गंभीरची अचिव्हमेंट मानतय येईल” असं सदागोपन रमेशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे.

सदागोपन पुढे म्हणाला की, “भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणं हीच गंभीरची मोठी कामगिरी असून यामध्ये श्रेयसकडून निर्णायक भूमिका बजावण्यात आली होती. त्यानंतर देखील गंभीर श्रेयसला सपोर्ट करत नसल्याचे दिसत आहे. यशस्वी सारखे खेळाडू हे एक्स फॅक्टर ठरत असतात. त्यामुळे त्याला सर्व फॉर्मेटमध्ये खेळवायला पाहिजे. त्याला राखीव म्हणून ठेवणं अयोग्य आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेली कामगिरी पाहता अय्यरला एकदिवसीय संघात कायम ठेवायला पाहिजे होते. खेळाडूंना समर्थन द्यायला हवं, जेणेकरुन त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरी कायम राहिल”, असंही सदागोपन रमेशने म्हटलं.

हेही वाचा : पृथ्वी शॉचे एक शतक ठरले गुणकारी! नवनवीन ऑफर घेऊन IPL फ्रेंचायझींची लागली रांग; मिनी लिलावात दिसेल परिणाम

श्रेयस अय्यरची शानदार कामगिरी

एकदिवसीय संघाच्या कर्णधारासाठी श्रेयस अय्यरचे नाव अद्याप चर्चेत आले नसले तरी तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे हे नकारून चालणार नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ११ सामन्यांमध्ये ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा फटकावल्या आहेत. त्याने टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठे योगदान दिले आहे.  जरी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत विजेता ठरला होता. या वर्षी, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ४८ पेक्षा जास्त सरासरीने २४३ धावा केल्या होत्या.  तो टीम इंडियाकडून  सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

Web Title: Former opener accuses gautam gambhir of excluding iyer from asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान
1

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
2

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

गंभीर अन् अय्यर लावणार वाट! ‘या’ चुका न टाळल्यास जाऊ शकते मालिका अन् लाज; Team India साठी ‘करो या मरो’
3

गंभीर अन् अय्यर लावणार वाट! ‘या’ चुका न टाळल्यास जाऊ शकते मालिका अन् लाज; Team India साठी ‘करो या मरो’

मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता
4

मालिका आणि अब्रू दोन्ही पणाला! श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाला लागला पराभवाचा शाप? ‘या’ लाजिरवाण्या आकड्यांनी वाढवली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.