
IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, "पॉवरप्लेमध्ये उपयुक्त..."
साऊथ आफ्रिकेने केला टीम इंडियाचा पराभव
भारतीय संघाचा तब्बल 76 धावांनी झाला पराभव
अक्षर पटेलला न घेण्याचे कारण आले समोर
India Vs South Africa 2026: सध्या टी-20 चा आंतरराष्ट्रीय विश्वचषक (T20 World Cup 2026)सुरू आहे. सुपर 8 च्या लढती सुरू झाल्या आहेत. त्यामध्येच काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 76 धावांनी पराभव केला. कालच्या सामन्यात अक्षर पटेलला खेळवण्यात आले नव्हते. त्यावर आता संघाचे सहायक कोच रायन टेन डेशकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काल भारतीय संघाचा तब्बल 76 धावांनी पराभव झाला. त्यानंतर संघाच्या प्लेइंग 11 वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. फॉर्ममध्ये असणाऱ्या अक्षर पटेलला संघात स्थान का मिळाले नाही असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर आता सहायक कोच रायन टेन डेशकाटे यांनी भाष्य केले आहे.
सहायक कोच रायन टेन डेशकाटे म्हणाले, “संघाचे नियोजन आणि साऊथ आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमध्ये अनेक दावख फलंदाज असल्याने काळजीपूर्वक हा निर्णय घेण्यात आला होता. क्विंटन डी कॉक, मिलर आणि रयान रिकल्टन हे भारतासाठी मोठा धोका होते. म्हणून संघाने पॉवरप्लेमध्ये उपयुक्त ठरेल आशा ऑफ स्पिन करणाऱ्या गोलंदाजाला प्राधान्य दिले. वाशिंग्टन सुंदर हा चांगला प्रभावी पर्याय ठरू शकतो असे आम्हाला वाटल्याने त्याला संधी देण्यात आली.”
दरम्यान अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले. त्याने दोन ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता 17 धावा दिल्या. तर फलंदाजी करताना 11 धावा केल्या. कालच्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याने सेमीफायनलमध्ये जाण्याचे भारताचा मार्ग खडतर झाला आहे.
गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल
गावस्कर यांनी जिओ स्टारला सांगितले की, “भारतीय फलंदाजांनी ब्रेव्हिस आणि मिलर यांच्यातील भागीदारीतून शिकून हा दृष्टिकोन स्वीकारायला हवा होता. भारतीय फलंदाजांनी असे केले नाही. ते अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरले, प्रत्येक चेंडूवर हल्ला केला आणि विकेट गमावल्या.” दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या प्रत्येक पैलूत भारतापेक्षा श्रेष्ठत्व सिद्ध केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली नव्हती, एकेकाळी तीन बाद २० अशी होती, पण त्यानंतर मिलर आणि ब्रेव्हिस यांनी ९७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सात बाद १८७ पर्यंत पोहोचण्यास मदत झाली.