
IND Vs ZIM
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे १३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने १० वेळा विजय मिळवला आहे आणि झिम्बाब्वेने ३ वेळा विजय मिळवला आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक असताना, भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला होता. पण त्यानंतर भारताने पुढील चार सामने जिंकले आणि मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यापूर्वी, झिम्बाब्वेने २०१५ आणि २०१६ मध्ये प्रत्येकी एकदा टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता.
भारताला झिम्बाब्वे आणि नंतर वेस्ट इंडिजला हरवून चार गुण मिळवावे लागतील. तरीही भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार नाही, कारण नेट रन रेटचे प्रश्न निर्माण होणार आहेत. जर भारताने त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सामन्यात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवले तर भारत आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरतील. तथापि, जर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना गमावला तर तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यानंतर नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीतील संघांचा निर्णय घेतला जाईल.
जरी कागदावर भारत शक्तिशाली असला, तरी झिम्बाब्वेने वेळोवेळी भारताला धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारताला सावध राहावे लागेल.