Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : गिल-अय्यर आणि अक्षर यांनी १५ वर्षानंतर दाखवली मधल्या फळीतली ताकद, युवराज-रैनाने केली होती कमाल

कालच्या सामन्यांमध्ये २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. या तिघांच्या स्फोटक खेळींमुळे भारतीय मधली फळी पूर्वीसारखीच मजबूत दिसत होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 07, 2025 | 08:37 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना : इंग्लंडविरुद्धच्या नागपूर एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने हा सामना ४ विकेट्सने जिंकण्यात यश मिळवले. यामध्ये भारताच्या संघासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळणार हर्षित राणा याने कमालीची गोलदांजी करून ३ फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. कालच्या सामन्यांमध्ये २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. या तिघांच्या स्फोटक खेळींमुळे भारतीय मधली फळी पूर्वीसारखीच मजबूत दिसत होती.

शुभमन गिलला त्याच्या ८७ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ९ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांसह ५९ धावा केल्या, तर अक्षर पटेलने ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. या तिगडीने टीम इंडियाला मालिकेचा पहिला विजय मिळवून दिला आणि मालिकेमध्ये भारताच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

1⃣0⃣0⃣-run stand ✅ Shubman Gill 🤝 Axar Patel Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZCvPtEpqqa — BCCI (@BCCI) February 6, 2025

या खेळींच्या जोरावर, गिल, अय्यर आणि अक्षर यांनी १५ वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विक्रमांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. धावांचा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांची ही यादी आहे. या यादीत शेवटचे विराट कोहली , युवराज सिंग आणि सुरेश रैना यांची नावे २०१० मध्ये नोंदली गेली होती. भारतीय एकदिवसीय इतिहासातील ही चौथी घटना आहे जेव्हा भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

१९९० मध्ये इंग्लंडविरुद्ध संजय मांजरेकर, डी. वेंगसरकर आणि अझरुद्दीन या त्रिकुटाने पहिल्यांदा ही कामगिरी केली होती, तर एका वर्षानंतर १९९१ मध्ये संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी करण्यात यश मिळवले.

5 महिन्यात 12 मॅचेस आणि 27 विकेट्स, टीम इंडियाचा खरा ‘बाजीगर’, पहिले ‘प्लेअर ऑफ द सिरीज’, आता ICC पुरस्कार

एकदिवसीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना ५०+ धावा करणारे भारताचे क्रमांक ३/४/५ खेळाडू

१९९० मध्ये इंग्लंड विरुद्ध
संजय मांजरेकर/डी. वेंगसरकर/अझरुद्दीन

१९९१ मध्ये श्रीलंका विरुद्ध
संजय मांजरेकर/सचिन तेंडुलकर/अझरुद्दीन

२०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध
विराट कोहली/युवराज सिंग/सुरेश रैना

२०२५ मध्ये इंग्लंड विरुद्ध*
शुभमन गिल/श्रेयस अय्यर/अक्षर पटेल

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करत त्यांना चांगली सुरुवात करून दिली. तथापि, पहिली विकेट पडल्यानंतर, संघ डगमगला आणि पुढच्या दोन धावांत आणखी दोन विकेट गमावल्या. जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी त्यांच्या अर्धशतकांसह डाव सावरला, परंतु तरीही इंग्लंडला २५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यानंतर भारताच्या संघाने २४९ धावांचे लक्ष्य ३८.४ ओव्हरमध्ये पूर्ण करून संघाने विजय मिळवला.

Web Title: Ind vs eng shubman gill shreyas iyer and akshar patel show strength in middle order after 15 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shreyas Iyer
  • Shubman Gill
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
2

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

DDCA च्या कामकाजाची पुन्हा एकदा झाली छाननी सुरू, Vinoo Mankad Trophy-19 संघाची चाचणीशिवाय स्पर्धेसाठी निवड
3

DDCA च्या कामकाजाची पुन्हा एकदा झाली छाननी सुरू, Vinoo Mankad Trophy-19 संघाची चाचणीशिवाय स्पर्धेसाठी निवड

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण
4

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.