Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK Asia Cup : हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींमुळे फायनलपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले! प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

अभिषेक आणि हार्दिक पंड्या यांना स्नायूंच्या दुखापतींमुळे त्रास सहन करावा लागला. हार्दिक मैदानाबाहेर गेला आणि तो पुन्हा दिसला नाही. त्यानंतर १० व्या षटकानंतर अभिषेक शर्मा मैदानाबाहेर गेला, त्यामुळे भारताचा ताण वाढला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 27, 2025 | 10:00 AM
फोटो सौजन्य - एक्स/सोशल मिडिया

फोटो सौजन्य - एक्स/सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२५ मधील सुपर फोर सामने आता संपले आहेत. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आता अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. तथापि, हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा यांना झालेल्या दुखापतींमुळे अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ताण वाढला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतींबद्दल अपडेट दिले.

अभिषेक शर्मा-हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर 

या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना स्नायूंच्या दुखापतींमुळे त्रास सहन करावा लागला. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने गोलंदाजीची सुरुवात केली आणि त्याच्या पहिल्याच षटकात कुसल मेंडिसला बाद केले. तथापि, या षटकानंतर हार्दिक मैदानाबाहेर गेला आणि तो पुन्हा दिसला नाही. त्यानंतर १० व्या षटकानंतर अभिषेक शर्मा मैदानाबाहेर गेला. सामन्याच्या शेवटी तिलक वर्मा देखील लंगडताना दिसला, ज्यामुळे जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांना क्षेत्ररक्षणासाठी सोडण्यात आले.

Bigg Boss 19 Eviction : आश्चर्यकारक! शोमधून बाहेर झाला हा स्पर्धक? तुम्ही पण केला नसेल हा विचार…वाचा सविस्तर

सामन्यानंतर मॉर्न मॉर्केल काय म्हणाला?

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा यांना झालेल्या दुखापतींबद्दल माहिती दिली. मॉर्केल म्हणाले की, सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना पेटके आले. हार्दिकची तपासणी केली जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. अभिषेक आता ठीक आहे.

Abhishek is fine, we will assess Hardik pandya overnight says Morne Morkel during Post Match PC. #AsiaCup2025 #InjuryUpdate pic.twitter.com/vWoziD1hvI — Ankan Kar (@AnkanKar) September 26, 2025

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. हा आशिया कप २०२५ मध्ये भारताचा सलग सहावा विजय होता. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त दोन धावा करता आल्या, तर भारताने तीन धावा करत सामना सहज जिंकला. भारताचा संघ फायनलमध्ये आणखी एकदा पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. पाकिस्तानच्या संघाला भारताने साखळी सामन्यामध्ये एकदा पराभुत केले होते त्यानंतर सुपर 4 च्या सामन्यामध्ये देखील पाकिस्तानला टीम इंडियाने हरवले. भारत आणि पाकिस्तान हे संघ आता तिसऱ्यांदा रविवारी आमनेसामने येणार आहेत. 

अभिषेक शर्माच्या बॅटने टीम इंडियासाठी पुन्हा एकदा गर्जना केली. अभिषेकने फक्त ३१ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची जलद खेळी केली. तिलक वर्मानेही ३४ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा केल्या. संजू सॅमसननेही चांगली फलंदाजी केली, २३ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये, अक्षर पटेलने १५ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघाला २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा गाठता आल्या.

Web Title: Ind vs pak asia cup team indias tension increased before the final match due to hardik and abhisheks injuries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 नंतर इशान किशन लग्न करणार? वडील प्रणव पांडे यांनी केला खुलासा
1

T20 World Cup 2026 नंतर इशान किशन लग्न करणार? वडील प्रणव पांडे यांनी केला खुलासा

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार
2

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

IND vs PAK, T20 World Cup : PCB अध्यक्ष नक्वी यांचे स्थान धोक्यात? भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर असीम मुनीरचा राग अनावर 
3

IND vs PAK, T20 World Cup : PCB अध्यक्ष नक्वी यांचे स्थान धोक्यात? भारताकडून लाजिरवाण्या पराभवानंतर असीम मुनीरचा राग अनावर 

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील
4

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.