Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI :  द्विशतक कुणामुळे हुकले? धावबाद होण्याला शुभमन गिल जबाबदार? यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. यावर त्याने आता मौन सोडले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 11, 2025 | 06:54 PM
IND vs WI: Who missed the double century? Is Shubman Gill responsible for the run-out? Yashasvi Jaiswal spoke clearly

IND vs WI: Who missed the double century? Is Shubman Gill responsible for the run-out? Yashasvi Jaiswal spoke clearly

Follow Us
Close
Follow Us:

Yashaswat Jaiswal spoke about the runout : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.  या कसोटीचा दूसरा दिवसाचा खेळ संपला असून वेस्ट इंडिजने ४ विकेट्स गमावून १४० धावा केल्या असून भारताने ३८७ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे द्विशतक हुकले, त्याचे कारण तो १७५ धावांवर असताना धावबाद झाला. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील कॉल चुकला आणि यशस्वी १७५ धावांवर बाद झाला. त्याच्या धावबाद होण्याला कोण जबाबदार? अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता यशस्वी जयस्वालने मौन सोडले आहे.

दुसऱ्या दिवसाची सुरवात झाली तेव्हा शुभमन गिल आणि  यशस्वी जयस्वाल मैदानावर होते. या दिवसाच्या आठव्या चेंडूवर जयस्वाल जलद एक धाव घेण्याचा प्रयत्न करत धावबाद झाला. जयस्वालने पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत फक्त दोन धावांची भर घातली. जेडेन सील्सच्या पूर्ण लांबीच्या चेंडूवर जयस्वालने मिड-ऑफच्या दिशेने खेळण्यासाठी आपले पाय वापरुन चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. नॉन-स्ट्राइक एंडवर उभ्या असलेल्या कर्णधार गिलने धाव घेण्यास नकार दिला आणि जयस्वाल आधीच धावला होता आणि तिथेच त्याचा गेम झाला. शुभमन गिलने त्या एका धावेमध्ये काही एक रस दाखवला नाही. जयस्वाल परत येईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तो धाव बाद झाला. त्यानंतर नाराज होऊन जयस्वाल बराच वेळ मैदानावरच राहिला निघून जाताना तो गिलवर खूप रागावलेला दिसला.

हेही वाचा : IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी

यशस्वी जयस्वाल काय म्हणाला?

दुसऱ्या  दिवसाचा खेळ संपल्यानंतर रन-आउटवर जयस्वालने मौन सोडले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सामन्यानंतरच्या मुलाखतीत प्रसारकाशी बोलताना जयस्वाल म्हणाला की, “मी नेहमीच शक्य तितका वेळ खेळण्याचा प्रयत्न करत असतो. जर मी खेळात असलो तर मी खेळ पुढे नेला पाहिजे आणि शक्य तितका वेळ खेळला पाहिजे.” धावबादबद्दल तो म्हणाला की, “हा एक खेळाचा भाग आहे, म्हणून ते ठीक आहे.”

तिसरे द्विशतक हुकल्याबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाला की, “मी नेहमीच हा विचार करत असतो की मी काय साध्य करू शकतो, माझे ध्येय काय असू शकते आणि माझ्या संघाचे ध्येय काय असू शकते. मी केवळ खेळात राहण्याचा प्रयत्न करतो आणि खात्री करतो की जर मी खेळात असलो तर मी शक्य तितका वेळ खेळला हवं.”

हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम

Web Title: Ind vs wi gill responsible for run out yashasvi jaiswal spoke clearly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill
  • Test Match
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 
1

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.