IPL 2025: Theft in RCB's dressing room, Virat Kohli's special item stolen, finally the thief was caught.., watch the video
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम जोरात असून आतापर्यंत २९ सामने झाले आहे. २८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने ९ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ४५ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर आरसीबीचा विजय सुकर झाला होता. या विजयानंतर ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट चोरीला गेल्याची बातमी समोर आली. ज्याचा आता एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
राजस्थानविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर विराट कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये त्याची किट बॅग पॅक करत होता, तेव्हा एका खेळाडूने त्याची बॅट स्वतःकडे ठेवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या सहकारी खेळाडूने त्याची बॅट त्याच्या किट बॅगमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर विराट काळजीत पडलेला दिसून आला आणि त्याने इकडे तिकडे त्याची बॅट शोधायला सुरुवात केली. अखेर जेव्हा त्याची बॅट परत मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला.
आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लिहिले होते की, टिम डेव्हिड विराट कोहलीची खिल्ली उडवत आहे. ड्रेसिंग रूममधील संभाषण अगदी बरोबर होते. टिम डेव्हिडने विराटच्या बॅगेतून काय काढले? आम्हाला कळवा.
𝐓𝐢𝐦 𝐃𝐚𝐯𝐢𝐝’𝐬 𝐩𝐫𝐚𝐧𝐤 𝐨𝐧 𝐕𝐢𝐫𝐚𝐭 𝐊𝐨𝐡𝐥𝐢 😂 🎀
Dressing room banter on point. What did Tim David take from Virat’s bag? Let’s find out. 😉#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/j9dIP1p2Np
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 14, 2025
राजस्थान रॉयल्सविरुद्ध विराट कोहलीने ४५ चेंडूचा सामना करत ६२ धावांची खेळी साकारली. या खेळीत विराटने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच या खेळीत त्याने त्याच्या बहुतेक धावा एकेरी आणि दुहेरीतून काढल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएल २०२५ च्या ६ सामन्यांमध्ये २४८ धावा चोपल्या असून तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत टॉप-५ मध्ये देखील सामील झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आरसीबीने ६ सामन्यांमधील चार सामने जिंकले आहेत. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, फिल सॉल्टने ६५ धावा केल्या तर विराट कोहलीने ६२ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्यासोबत, देवदत्त पडिकलने ४० धावा काढून विजयात मोठा वाटा उचलला. आरसीबीने केवळ १७.३ षटकांत एका गडी गमावून १७५ धावा पूर्ण करून विजय मिळवला.