
केएल राहुलच्या विधानावरून पुन्हा चर्चा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
जतीन सप्रू यांच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये केएल राहुल म्हणाला, “कर्णधार म्हणून मला सर्वात कठीण गोष्ट वाटली ती म्हणजे मालकांच्या पातळीवर होणाऱ्या असंख्य बैठका, आढावा आणि स्पष्टीकरणे. हे मानसिकदृष्ट्या खूप थकवणारे होते. आयपीएल हंगाम संपेपर्यंत, १० महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर जेवढा थकवा जाणवतो, त्यापेक्षा जास्त मानसिक आणि शारीरिक थकवा मला जाणवला. तुम्ही काही विशिष्ट निर्णय का घेतले, एखाद्या खेळाडूची निवड का केली, किंवा संघाने खराब कामगिरी का केली, असे प्रश्न तुम्हाला सतत विचारले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तुम्ही प्रशिक्षक आणि निवड समितीला जबाबदार असता, ज्यांना खेळातील बारकावे समजतात.”
KL Rahul ने असे उत्तर देत एक प्रकारे संजीव गोएंका यांच्यावर निशाणाच साधला. संजीव गोएंका यांनी मैदानावर दिलेली प्रतिक्रिया कोणताही खेळाडू आणि चाहता विसरणार नाही. केएलने कोणाचेही नाव न घेता योग्य शब्दात नक्की काय घडते याची कल्पना सर्वांना दिली असल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर आता ऋषभ पंतदेखील एलएसजीमधून बाहेर पडला आहे.
IPL 2027: हार्दिक पांड्या खरंच सोडणार Mumbai Indians ची साथ? डीलपूर्वीच चर्चेत
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर केएल राहुल आणि संजीव गोएंका यांच्यातील वाद समोर आला. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने ४ गडी गमावून १६५ धावा केल्या, तर एसआरएचने एकही गडी न गमावता अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्य पूर्ण केले. सामना संपताच संजीव मैदानात उतरला आणि राहुलसोबत त्याचा वाद सुरू झाला. दोघांमधील संभाषणाचा तपशील उघड करण्यात आलेला नाही, परंतु परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्स दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचले. २०२४ मध्ये लीग टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर राहुलने संघ सोडला. ऋषभ पंतने संघाची सूत्रे हाती घेतली, परंतु पुढील दोन हंगामात तो अव्वल चारमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. याचा अर्थ आता राहुल आणि पंत एकत्र खेळताना दिसू शकतील.
IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद