Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs DC: 90% पडणार पाऊस, मुंबईत ‘यलो अलर्ट’, रद्द होणार आजचा सामना? दिल्लीच्या मालकांचा BCCI कडे धावा

आयपीएल २०२५ मध्ये आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हंगामातील ६३ व्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता हा सामना काय घेऊन येणार पाहावे लागणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 21, 2025 | 02:42 PM
आजच्या सामन्याची स्थिती काय (फोटो सौजन्य - Instagram)

आजच्या सामन्याची स्थिती काय (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ मध्ये आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हंगामातील ६३ व्या सामन्यावर पावसाचे जोरदार सावट असल्याचे दिसून येत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे आणि हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. 

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर सामना रद्द झाला किंवा पावसामुळे व्यत्यय आला तर त्याचा प्लेऑफ समीकरणांवर मोठा परिणाम होईल. या सामन्यात पावसाचा धोका लक्षात घेता, दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी बीसीसीआयकडे अपील केले आहे (फोटो सौजन्य – Instagram) 

Playoff ची लढाई

कोण मारणार बाजी?

एकच जागा आणि दोन स्पर्धक अशी सध्या स्थिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आता चौथ्या रिकाम्या जागेसाठी शर्यतीत आहेत. तथापि, समीकरण इतके सोपे नाही. 

आजचा एमआय आणि डीसी यांच्यातील सामना एक प्रकारचा वर्च्युअल नॉकआउट असू शकतो. पण या सामन्याचे गणित वेगळे चित्र दर्शवते. जर आज मुंबई इंडियन्सची टीम जिंकली तर टॉप-४ मधील त्यांचे स्थान निश्चित होईल आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ बाहेर पडेल. पण जर दिल्लीची टीम जिंकली, तर चौथे स्थान अजूनही रिक्त राहील आणि त्यानंतर उर्वरित सामन्यांचे निकाल दोन्ही संघांचे भवितव्य ठरवतील. दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामना पावसाच्या सावलीत असल्याने ही शर्यत अधिकच रंजक होताना दिसून येत आहे. 

CSK Vs RR: यशस्वी जयस्वालचा IPL मध्ये बोलबाला! बनवला महारेकॉर्ड; ठरला जगातील पहिला फलंदाज

मुंबईत यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे. काही अहवालांनुसार, संध्याकाळी ७ वाजता टॉसच्या वेळी पावसाची ५०% शक्यता आहे, जी रात्री १० पर्यंत ८०-९०% पर्यंत वाढू शकते. अ‍ॅक्यूवेदर सारख्या हवामान वेबसाइटनेही पावसाची शक्यता ९०% असल्याचे भाकित केले आहे, किमान दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर हवामान असेच राहिले तर सामन्यावर परिणाम होणे निश्चित आहे, ज्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक होईल.

पार्थ जिंदालचे अपील

पावसाची शक्यता लक्षात घेता, दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी BCCI ला सामना दुसऱ्या शहरात हलवण्याची विनंती केली आहे जेणेकरून सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळवता येईल. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जिंदालने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सामना वाया जाण्याची दाट शक्यता आहे.’ त्यांनी पुढे लिहिले. ‘ज्याप्रमाणे आरसीबी आणि एसआरएच यांच्यातील सामना बेंगळुरूबाहेर हलवण्यात आला आहे, त्याचप्रमाणे मी विनंती करतो की हा सामनाही दुसऱ्या ठिकाणी हलवावा, कारण गेल्या ६ दिवसांपासून २१ तारखेला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.’ याची आपल्याला कल्पना आहे. 

सामना रद्द झाला तर काय होईल?

मॅच रद्द झाल्यास काय होऊ शकते

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सध्या, मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. जर सामना रद्द झाला तर मुंबईचे १५ गुण होतील आणि दिल्लीचे १४ गुण होतील. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना प्लेऑफसाठी त्यांच्या शेवटच्या उर्वरित सामन्यावर (जो पंजाब किंग्ज विरुद्ध आहे) अवलंबून राहावे लागेल.

IPL 2025 : मुंबईच्या संघामध्ये प्लेऑफच्या आधी केले तीन बदल! इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या खेळाडूचा केला समावेश

कोणाचे जास्त नुकसान?

जर सामना रद्द झाला तर दिल्ली कॅपिटल्सला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला त्यांचा शेवटचा सामना जिंकून थेट प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी असेल, तर दिल्लीला त्यांचा शेवटचा सामना जिंकूनही इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागू शकते. 

बीसीसीआयने अलीकडेच एक नियम बनवला आहे, ज्यानुसार उर्वरित लीग सामन्यांमध्ये १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल, जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना पूर्ण ४० षटकांसाठी खेळवता येईल. मुंबईतील हवामानाचा या महत्त्वाच्या सामन्यावर किती परिणाम होतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Web Title: Mi vs dc ipl match may cancel due to rain yellow alert in mumbai dc co owner parth jindal requested bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • MI vs DC

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
2

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
3

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये  रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?
4

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.