
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टी२० विश्वचषक २०२६ चा शुभारंभ हा ७ फेब्रुवारीपासून होत आहे. एकूण २० संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवले जाणार आहे. एक महिना ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या जेतेपदाचे रक्षण करेल. १० वर्षांनंतर, भारत श्रीलंकेसोबत टी२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत आहे.
चार गटामध्ये 20 संघाचे विभाजन करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यापासून विश्वचषक स्पर्धेचे अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. तथापि, आजपर्यंत कोणत्याही संघाला आपले जेतेपद राखण्यात यश आलेले नाही. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विश्वचषकाबाबत एक धाडसी भाकित केले आहे. वॉनने उपांत्य फेरीत पोहोचण्याची क्षमता असलेल्या चार संघांची नावे सांगितली आहेत.
मायकेल वॉनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे दिली आहेत. वॉनने यजमान भारताला पहिला संघ म्हणून निवडले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. सूर्याच्या सैन्याला हरवणे हे सध्या प्रत्येक मोठ्या संघाचे स्वप्न आहे.
माजी इंग्लंड कर्णधाराने इंग्लंडला दुसऱ्या संघ म्हणून निवडले आहे. वॉनचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देखील अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी शर्यतीत असू शकतात. तथापि, वॉनचा असा विश्वास आहे की पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरतील.
My 4 T20 World Cup semi finalists will be … India , England , NZ & Australia … #OnOn #India — Michael Vaughan (@MichaelVaughan) February 2, 2026
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारतीय संघाने नुकतीच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ४-१ असा पराभव केला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन फलंदाजीसह उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार सूर्या स्वतः फॉर्ममध्ये परतला आहे. हार्दिक पंड्या फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून सातत्याने कामगिरी करत आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या गोलंदाज जोडीने त्यांच्या कामगिरीने सातत्याने प्रभावित केले आहे.