Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचे नाटक काही संपेना! आता थेट मॅच रेफरी भारताचा ‘फिक्सर’; तर सोशल मीडियावर खोटेपणा उघड

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने मॅच रेफरीवर गंभीर आरोप करत त्यांना टीम इंडियाचा 'फिक्सर' म्हणून संबोधले होते. पण आता रमीझच्या या विधानाची सोशल मीडियावर पोलखोल झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 18, 2025 | 04:19 PM
Pakistan (Photo Credit- X)

Pakistan (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे नाटक काही संपेना!
  • मॅच रेफरी भारताचा ‘फिक्सर’ असल्याचा आरोप
  • सोशल मीडियावर खोटेपणा उघड
Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा गोंधळ घातला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानने आयसीसीकडे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळली. याच दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने मॅच रेफरीवर गंभीर आरोप करत त्यांना टीम इंडियाचा ‘फिक्सर’ म्हणून संबोधले होते. पण आता रमीझच्या या विधानाची सोशल मीडियावर पोलखोल झाली आहे.

रमीझ राजांचा दावा खोटा ठरला

रमीझ राजाने अँडी पायक्रॉफ्टवर आरोप करताना म्हटले होते की, त्यांनी आतापर्यंत भारताच्या ९० सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून काम केले आहे. रमीझच्या मते, पायक्रॉफ्ट यांनी भारताच्या सामन्यांमध्ये गरज असल्यापेक्षा जास्त वेळा रेफरीची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ते टीम इंडियाचे ‘फिक्सर’ आहेत. मात्र, रमीझ राजाचा हा दावा आता खोटा ठरला आहे.

Controversial match referee “Andy Pycroft is a favourite of India. He has been the referee 90 times in India’s matches” says Ramiz Raja pic.twitter.com/JdwGi54nJ5 — Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 17, 2025

सोशल मीडियावर आकडेवारीने केली पोलखोल

गार्गी रावत नावाच्या एका सोशल मीडिया युजरने रमीझ राजांच्या विधानाची पोलखोल केली. तिने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, अँडी पायक्रॉफ्ट यांनी आतापर्यंत एकूण ५३५ सामन्यांमध्ये रेफरीची भूमिका बजावली आहे. त्यात त्यांनी भारताच्या १२४ सामन्यांमध्ये, इंग्लंडच्या १०७ सामन्यांमध्ये आणि पाकिस्तानच्या १०२ सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून काम केले आहे.

Out of the 535 men’s matches Andy Pycroft has officiated, 124 were for India with almost identical numbers for others: 107 for England and 102 for Pakistan. So what exactly are you trying to prove? Atleast get the numbers right. https://t.co/X93IZCCJ3g — Gargi Raut (@gargiraut15) September 17, 2025


हे आकडे पाहिले असता, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांमधील रेफरीची संख्या जवळपास सारखीच आहे. त्यामुळे, रमीझ राजांचा आरोप पूर्णपणे निराधार ठरला आहे. आता सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर जोरदार टीका होत आहे.

Asia cup 2025 : या पाकिस्तानचं करायचं काय? गाठली खालची पातळी! पायक्रॉफ्टनच्या  माफीचा Video केला व्हायरल..

१७ सप्टेंबर रोजी घडले होते ‘हे’ नाट्य

मॅच रेफरीला हटवण्याची पाकिस्तानची मागणी आयसीसीने फेटाळल्यानंतर, १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने यूएई विरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र, आयसीसीने दबाव टाकल्यानंतर पाकिस्तानला शेवटी माघार घ्यावी लागली आणि निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा हा सामना सुरू झाला.

भारत-पाकिस्तानचा महामुकाबला कधी होणार?

आज आफगाणिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला, तर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर होईल. अशा परिस्थितीत, टीम इंडियाच्या सुपर-४ वेळापत्रकाबाबत बोलायचं झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया २४ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी ग्रुप-बी मधून पात्र ठरलेल्या इतर दोन संघांविरुद्ध (श्रीलंका, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश) सामने खेळेल.

Web Title: Pakistans drama is not over now the match referee is indias fixer while the lies are exposed on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?
1

IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी
2

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

NZ vs AFG : Mitchell Santner च्या सेनेने केला पहिला विजय नावावर! अफगाणिस्तानचा 5 विकेट्सने केला पराभव
3

NZ vs AFG : Mitchell Santner च्या सेनेने केला पहिला विजय नावावर! अफगाणिस्तानचा 5 विकेट्सने केला पराभव

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…
4

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.