वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना भेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये साक्षी चौधरी म्हणाली की, हॅलो मित्रांनो, आज पंतप्रधान सरांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना बोलावले आहे आणि आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटत आहे. यापुढे मोदी म्हणाले की, जो खेलेगा वो खिलेगा. देशाला नेहमी प्रोत्साहन द्या. यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली, जी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंनी पुन्हा उच्चारली. हा व्हिडिओ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games. Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters. pic.twitter.com/1zkYCKiV8r — Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026
ग्लासगोमध्ये भारताने एकूण ३९ पदके जिंकली, ज्यात १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश होता. पदक तालिकेत भारताने चौथे स्थान मिळवले. परंतु, यावेळी राष्ट्रकुल खेळांचा कार्यक्रम खूपच मर्यादित होता आणि भारतासाठी पदकांची मोठी शक्यता असलेले कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी आणि नेमबाजी यांसारखे खेळ त्यात समाविष्ट नव्हते. अशा परिस्थितीतही भारताने चमकदार कामगिरी करत ३९ पदकांची कमाई केली. भारताने प्रामुख्याने बॉक्सिंग, ज्युडो, ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी केली. आता सर्वांचे लक्ष जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेवर आहे. जिथे भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
बॉक्सिंग हा भारताच्या सर्वात यशस्वी खेळांपैकी एक होता. भारतीय बॉक्सर्सनी सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह एकूण १० पदके जिंकली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये प्रीती पवार (५४ किलो), जस्मिन लंबोरिया (५७ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो), प्रिया घंघास (६० किलो), अरुंधती चौधरी (७० किलो), सचिन सिवाच (६० किलो) आणि अंकुश पांघल (८० किलो) यांचा समावेश होता.
रौप्यपदक विजेत्यांमध्ये जादुमणी सिंग (५५ किलो), लव्हलिना बोरगोहेन (७५ किलो) आणि नरिंदर बरवाल (९०+ किलो) यांचा समावेश होता. भारतीय महिला बॉक्सर्सनी राष्ट्रकुल खेळांच्या एकाच आवृत्तीत सात सुवर्णपदके जिंकून आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.






