
फोटो सौजन्य - PTI सोशल मिडिया
तिलक वर्मा टी२० विश्वचषक २०२६: भारताच्या संघाने विश्वचषक जिंकून एक आठवडा झाला आहे, संघाने या विश्वचषकामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली होती. तिलक वर्माने या विश्वचषकामध्ये अनेक वेगवेगळ्या स्थानावर फलंदाजी केली आणि त्यांनी संघासाठी काही महत्वाच्या धावा करुन संघाला विजयापर्यत नेण्यास मोलाचे योगदान दिले. नुकताच झालेला विश्वचषक विजयानंतर बीसीसीआयने टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा सन्मान केला.
भारताने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. सलग दोन टी२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला आणि एकमेव संघ ठरला. भारतीय संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा देखील टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा भाग होता. आता, विश्वविजेता बनल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते तिलक यांचा सन्मान करण्यात आला आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ८ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तिलक वर्मा यांचा सन्मान केला, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रेड्डी यांनी तिलक यांना पदक देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिलक आणि रेवंत यांनी हस्तांदोलन केले. यावेळी भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारीही उपस्थित होते.
VIDEO | Hyderabad: Team India cricketer Tilak Varma (@TilakV9) meets Telangana CM Revanth Reddy (@revanth_anumula) after T20 World Cup triumph. (Source: Third Party)#TilakVarma #RevanthReddy #t20worldcup2026champion pic.twitter.com/nWhU5zA2E6 — Press Trust of India (@PTI_News) March 16, 2026
टी-२० विश्वचषकात तिलक वर्माने भारतासाठी मोठी खेळी केली नाही. मात्र, त्याच्या छोट्या खेळीने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने नऊ सामन्यांमध्ये १५४.४७ च्या स्ट्राईक रेटने २०७ धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने नाबाद ४४ धावांची खेळी केली, जो टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा विजय ठरला. अंतिम सामन्यात तिलकने नाबाद ८ धावा केल्या. आतापर्यंत, या २३ वर्षीय खेळाडूने भारतासाठी पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ६८ धावा आणि ४९ टी-२० सामन्यांमध्ये ४४.८३ च्या सरासरीने १३९० धावा केल्या आहेत. तो आता आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.