
Tamilnadu मध्ये सरकार बदललं! आता CSK चा विजय नक्की? पहा 'ते' खास राजकीय कनेक्शन
चेन्नई आयपीएल 2026 चे विजेतेपद जिंकण्याचा अंदाज
तामिळनाडूमध्ये सत्ता बदल होताच चेन्नईने जिंकलीये ट्रॉफी
आज चेन्नई आणि एसआरएच आमनेसामने
CSK/IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. यंदाचे विजेतेपद कोण जिंकणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत 4 पैकी केवळ आरसीबीचा संघ क्वालिफाय झाला आहे. मात्र यंदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ ट्रॉफी जिंकणार अशी चर्चा क्रीडा विश्वात केली जात आहे. यामागे तामिळनाडूमध्ये झालेला सत्ताबदल कारणीभूत असल्याचे समजते आहे.
आयपीएलचा विजेता कोण होणार याचे अधिकृत उत्तर 31 मे रोजी मिळणार आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका अशा रंजक योगायोगाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चाहते आतापासूनच जल्लोष करू लागले आहेत. हा योगायोग तामिळनाडूच्या राजकारणातील सत्ताबदलाशी संबंधित आहे.
IPL 2026: RCB ची प्लेऑफमध्ये दमदार एन्ट्री, ३ स्पॉटसाठी ७ संघामध्ये चुरस; कोण मारणार बाजी?
नेमके प्रकरण काय?
आयपीएलच्या इतिहासात एक पॅटर्न दिसून आला आहे. जो एक योगायोग म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. जेव्हा- जेव्हा तामिळनाडूमध्ये सरकार बदलले जाते, तेव्हा तेव्हा आयपीएलची ट्रॉफी चेन्नई सुपर किंग्सने उंचावली असल्याचे पाहायला मिळाले आहे.तामिळनाडूमध्ये 2011 मध्ये सत्ताबदल झाला होता. त्यावर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तसेच 2021 मध्ये देखील तामिळनाडू राज्यात सरकार बदलले होते आणि योगायोगाने त्याच वर्षी दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईने ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
2026 मध्ये पुनरावृत्ती होणार?
2011 आणि 2021 मध्ये तामिळनाडूमधील सत्ताबदल आणि चेन्नईने जिंकलेली ट्रॉफी असा योगायोग जुळून यंदा 2026 मध्ये येणार का? हे पहावे लागणार आहे. 2026 मध्ये तामिळनाडूमध्ये सरकार बदलले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी
प्ले ऑफच्या शर्यतीत 7 संघ
इंडियन प्रिमियर लीग 2026 आता निर्णायक आणि रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. लीग स्टेजमध्ये फक्त ८ सामने बाकी आहेत. तरीही प्लेऑफसाठी फक्त एकच संघ क्वालिफाय झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 13 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करणारा पहिला संघ ठरला आहे. आता उर्वरित तीन जागांसाठी 7 संघासामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचे गणित बदलत आहे. यामुळे प्लेऑफच्या रेसमध्ये कोणते संघ क्वालिफाय करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.