Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र सरकारकडूनक्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना सावत्र वागणूक; बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचा गंभीर आरोप

भारतीय संघ विश्वचॅम्पियन बनल्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. परंतु, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने महाराष्ट्र सरकारवर हे इतर खेळांना सावत्र वागणूक देतात, असा मोठा आरोप केला आहे. कारण, याचा प्रत्यय मला आल्याचे त्याने सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 08, 2024 | 08:56 PM
Badminton player Chirag Shetty

Badminton player Chirag Shetty

Follow Us
Close
Follow Us:

Badminton player Chirag Shetty : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारनेही भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, यावरून आता बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने महाराष्ट्र सरकारवर भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र सरकार केवळ क्रिकेटला प्राध्यान्य देत असून, इतर खेळांना सावत्र वागणूक देत असल्याचे त्याने सांगितले.

महाराष्ट्र सरकारवर भेदभावाचा आरोप

चिराग शेट्टीने नुकतीच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने महाराष्ट्र सरकारवर भेदभाव करत असल्याचे गंभीर आरोप केले. तसेच माझा क्रिकेटला विरोध नसून ज्या प्रकारे इतर खेळांना डावललं जातं, या वृत्तीला विरोध आहे, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

नेमकं काय म्हणाला चिराग शेट्टी?
“दोन वर्षांपूर्वी भारताने थॉमस चषक जिंकला होता. थॉमस चषक जिंकणं हा विश्वचषक जिंकण्यासारखा आहे. त्या भारतीय बॅटमिंटन संघाचा मी भाग होतो. भारतीय संघाने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय संघात मी महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू होतो. मात्र, त्यावेळी सरकारने आमच्या विजयाकडे दुर्लक्ष केलं, असं चिराग शेट्टी म्हणाला. जर सरकार विश्वचषक विजेत्या संघाचा सत्कार करू शकते, तर ते इतर खेळातील खेळांडूंचा सत्कार का करत नाही? सरकारने सर्व खेळांना समान वागणूक दिली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

“बक्षिस सोडा, सरकारने माझा सत्कारही केला नाही”
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझा क्रिकेटला विरोध नाही. मी सुद्धा क्रिकेटचे सामाने बघतो. विश्वचषकाचा अंतिम सामना मी पण बघितला. भारतीय संघाच्या विजयाने जो आनंद सर्वांना झाला, तेवढात आनंद मलाही झाला. मात्र, दोन वर्षांपूर्वी आम्ही अशाच प्रकारे उल्लेखनिय कामगिरी केली होती. आम्ही थॉमस चषक जिंकत इतिहास घडवला होता. परंतु, राज्य सरकारने रोख बक्षिस देणं सोडा, पण माझा साधा सत्कारही केला नाही”, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

Web Title: Treatment of sports other than cricket by maharashtra government badminton player chirag shettys serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 08:56 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2024
  • Maharashtra Government
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
4

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.