हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत मोठा उलटफेर बघायला मिळाला. या स्पर्धेत भारताला एकाच दिवशी सलग तीन पराभव पत्करावे लागले, त्यामुळे हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेतून भारताला बाहेर पडावे लागले.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत कुवेत आणि यूएई सारख्या लहान संघांकडून पराभव पत्करावा लागला. पूल सी मध्ये कुवेतकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला.