कोल्हापूरातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय मिळाल्याला नाही.न्यायालयात खून सिध्द झाल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्ष झालं तरी अजूनही कुटुंबीयांना मृत्यूचा दाखल मिळत नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.पतीसह कुटुंबीयांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे..न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे..मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही. असा दावा करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10 वर्षे उलटले, न्यायालयाने खून झाल्याचे स्पष्ट केलंय. तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे. यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलीसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूरातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय मिळाल्याला नाही.न्यायालयात खून सिध्द झाल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्ष झालं तरी अजूनही कुटुंबीयांना मृत्यूचा दाखल मिळत नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.पतीसह कुटुंबीयांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे..न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे..मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही. असा दावा करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10 वर्षे उलटले, न्यायालयाने खून झाल्याचे स्पष्ट केलंय. तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे. यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलीसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.