
LATUR
लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्यात आला असून कार्यकर्त्यांचा रेटा निवडून येणाऱ्यांची क्षमता पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी निलंगा येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. दरम्यान निलंगा उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत असली तरी निवडणूक निकालानंतर आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.