नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून येणाऱ्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात असून त्यामुळे आंबा खवय्यांसाठी ही पर्वणी ठरत आहे. मात्र हवामानातील बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला असून कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत असल्याने दर अजूनही वरचढ असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर उच्च राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून येणाऱ्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात असून त्यामुळे आंबा खवय्यांसाठी ही पर्वणी ठरत आहे. मात्र हवामानातील बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला असून कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत असल्याने दर अजूनही वरचढ असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर उच्च राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.