महाराष्ट्र–गुजरात सीमावादात मनसेने थेट उडी घेतली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील वेवजी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील असल्याची सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. महाराष्ट्राचा नकाशा हळूहळू बदलण्याचा आणि गाव गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, ग्रामपंचायत महाराष्ट्राची असताना परवानग्या मात्र गुजरातकडून दिल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष पसरल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र–गुजरात सीमावादात मनसेने थेट उडी घेतली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील वेवजी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील असल्याची सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. महाराष्ट्राचा नकाशा हळूहळू बदलण्याचा आणि गाव गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, ग्रामपंचायत महाराष्ट्राची असताना परवानग्या मात्र गुजरातकडून दिल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष पसरल्याचे त्यांनी सांगितले.