पनवेल तालुक्यात कथित भूमाफियागिरीविरोधात ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी संबंधित रस्ताच तोडून आपला तीव्र निषेध नोंदवला. ‘वाधवा सिटी’ प्रकल्पाच्या नावाखाली शेतजमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही स्पष्ट परवानगी किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता विकासाच्या नावाखाली काम सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृती करत रस्ता उद्ध्वस्त केला.
पनवेल तालुक्यात कथित भूमाफियागिरीविरोधात ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी संबंधित रस्ताच तोडून आपला तीव्र निषेध नोंदवला. ‘वाधवा सिटी’ प्रकल्पाच्या नावाखाली शेतजमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही स्पष्ट परवानगी किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता विकासाच्या नावाखाली काम सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृती करत रस्ता उद्ध्वस्त केला.