Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Bangladesh Relations: विक्रम मिसरींचा तिखट वार; अन् बांगलादेशची तलवार म्यान

सध्या भारत आणि बांगलादेशातील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध बिकट परिस्थितीवर पोहोचले आहेत. दरम्यान बांगलादेशचे पराराष्ट्र मंत्री यांचे एक वक्तव्य समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2024 | 10:53 AM
India-Bangladesh Relations: विक्रम मिसरींचा तिखट वार; अन् बांगलादेशची तलवार म्यान
Follow Us
Close
Follow Us:

ढाका: सध्या भारत आणि बांगलादेशातील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध बिकट परिस्थितीवर पोहोचले सध्या भारत आणि बांगलादेश संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. दोन्ही देशांतील संबंध बिकट परिस्थितीवर पोहोचले असून अनेकांनी बांगलादेशला संबंध सुधारण्याचा सल्ला दिला.

दरम्यान अमेरिकेने देखील दोन्ही देशांनी मिळून शांततेच्या मार्ग काढावा असे म्हटले आहे. अलीकडे काही घडामोडींमुळे बांगलादेशातील अंतरिम सरकारचा दृष्टीकोन बदलत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशची भेट घेऊन परस्पर हितसंबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

बांगलादेशचे भारताला मैत्रीचे संकेत

विक्रम मिसरी यांनी म्हटले होते की, बांगलादेश अंतरिम सरकारने भारतासह सर्व देशांशी समानतेच्या आणि परस्पर आदरावर आधारित संबंध प्रस्थापित करावेत. विक्रम मिसरी यांच्या या इच्छेवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी एका बैठकीत या बदलत्या धोरणावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, बांगलादेशने भारताला मैत्रीचे संकेत दिले असून, संबंध परस्पर हितावर आधारित असावेत, असे सरकारचे मत आहे.

तसेच, बांगलादेश सर्व देशांशी आदर आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित संबंध मजबूत करू इच्छित आहे.हुसैन यांनी असेही स्पष्ट केले की, अंतरिम सरकारच्या उद्दिष्टांमध्ये निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासन व्यवस्था प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या चिंतेचा विचार करणे, आणि आगामी निवडणुकीसाठी आवश्यक सुधारणा करणे हे समाविष्ट आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतासाठी धोक्याची घंटा; युनूस सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ISI चा थेट बांगलादेशात प्रवेश

बांगलादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती

बांगलादेशमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीगला बहुमत मिळाले होते. पण, त्यानंतर निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तसेच, देशभरात विद्यार्थी आंदोलन आणि हिंसाचार उफाळला. या परिस्थितीत शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.

मात्र, नागरिकांमध्ये ही प्रश्न उपस्थित होत आहेत की, देशाची सत्ता जनतेने निवडलेल्या सरकारकडे कधी हस्तांतरित होईल. यावर परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांनी सांगितले की, सरकार सध्या काही सुधारणा करत आहे. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीद्वारे सत्तांतरण केले जाईल.

भारत आणि बांगलादेशातील संबंधांमध्ये सकारात्मक बदल? 

सध्या बांगलादेशाकडे भारताने मैत्रीपूर्ण संकेत दिल्यानंकर बांगलादेशानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सराकारच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. भारत-बांगलादेश संबंधांमध्ये ही बदलती भूमिका दोन्ही देशांसाठी नवे पर्व ठरू शकते. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या सकारात्मक बदल होतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताची चिंता वाढली; पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर रशियाचा भर, काय आहे नेमकं प्रकरण?

Web Title: Bagladesh external affairs advisor on india bangladesh relation says want to bulid friendly relation nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 10:53 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • world

संबंधित बातम्या

शेख हसीनाचे ढाका येथे प्रत्यार्पण करण्याची विनंती; बांगलादेशची मागणी भारत पूर्ण करणार का?
1

शेख हसीनाचे ढाका येथे प्रत्यार्पण करण्याची विनंती; बांगलादेशची मागणी भारत पूर्ण करणार का?

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री
2

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
3

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
4

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.