Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सध्या मोठा तणाव निर्माण झाला असून बांगलादेशने भारतीय नागरिकांसाठी सर्वसाधारण व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरू राहणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 09, 2026 | 11:06 AM
India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

India Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधांत तणाव; भारतीयांसाठी व्हिसा सेवा केली स्थगित

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत–बांगलादेश संबंध बिघडले
  • व्हिसा सेवा थांबवण्याचा घेतला निर्णय
  • IPL व हिंदू हल्ला ठरला कारणीभूत
 

India Bangladesh Relations: भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सध्या मोठा तणाव निर्माण झाला असून बांगलादेशने भारतीय नागरिकांसाठी सर्वसाधारण व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, आगर्तळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील बांगलादेशी दूतावास व वाणिज्य दूतावासांना तात्काळ प्रभावाने सामान्य व्हिसा देणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय बीसीसीआयने आयपीएलमधून बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक? फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयचे म्हणणे होते. गेल्या १८ दिवसांत सहा हिंदूंची हत्या झाल्याच्या घटनांनी परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. दरम्यान, बांगलादेशात उस्मान हादी यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. निदर्शकांकडून भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि भारतीय दूतावासांवरही हल्ले झाले. यानंतर भारताने चितगावमधील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र बंद करून बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा सेवा आधीच स्थगित केली होती.

याच दरम्यान सुरक्षेची कारणं पुढे करून बांगलादेशने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भारत आणि बांगलादेशात गेल्या काही महिन्यापासून तणावाचे वातावरण आहे. माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची सत्ता गेल्यावर ते भारतात राहत असून यामुळे बांगलादेशासोबत भारताचे संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा: World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी

तसेच, व्हिसा संबधित विचारणा करताच बांगलादेशच्या मंत्रालयाने स्पष्ट करत म्हणाले की, सध्याच्या या गंभीर परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, हा निर्णय कोणत्याही एका गोष्टीवरून न घेता अनेक गोष्टींवरून घेतल्याचे बांगलादेशच्या सरकारने सांगितले आहे. यामुळे बांगलादेशात यापुढे भारतीयांना जाता येणार नसल्याचे ही सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच भारताने बांगलादेशातून येणाऱ्या काही लोकांवर कडक निर्बंध लादले होते, आणि कडक कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु, भारताला या निर्णयाचा फारसा फरक पडणार नाही. कारण, भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या लोकांची संख्या तशी फार कमी आहे.

Web Title: India bangladesh political tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Bangaldesh
  • india
  • Visa Rule

संबंधित बातम्या

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड
1

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

फोर्टिफाइड तांदूळ वितरणाला तात्पुरती स्थगिती; प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोठा निर्णय
2

फोर्टिफाइड तांदूळ वितरणाला तात्पुरती स्थगिती; प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोठा निर्णय

PM Kisan: होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार का? काय आहे अपडेट ?
3

PM Kisan: होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार का? काय आहे अपडेट ?

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
4

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.