Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

British Raj :दुलीप सिंग,पंजाबचे शेवटचे महाराजा, ज्यांना ब्रिटिशांनी कोहिनूर हिसकावून घेतल्यानंतर ब्रिटन सोडण्याची परवानगी नव्हती.

महाराजा दलीप सिंग हे शीख साम्राज्याचे शेवटचे राजे आणि महाराजा रणजीत सिंग यांचे सर्वात धाकटे पुत्र होते. त्यांचे आयुष्य दुःखद आणि भावनिक होते. महाराजा असतानाच, लहानपणीच त्यांचे राज्य, धर्म, कुटुंब आणि मातृभूमी हिरावून घेण्यात आली. त्यांना ब्रिटनमध्ये हद्दपार करण्यात आले आणि भारतात परतण्यास बंदी घालण्यात आली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 27, 2026 | 09:33 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • महाराजा दिलीप सिंग फक्त दोनदाच भारतात आले .
  • ब्रेनवॉश करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली
  • कोहिनूर हिऱ्याचे शेवटचे वारसदार
लंडन: महाराजा दलीप सिंह हे महाराजा रणजित सिंह यांचे सर्वात धाकटे पुत्र आणि शीख साम्राज्याचे शेवटचे शासक होते. 1843 मध्ये वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना त्यांच्या आई राणी जिंदान यांच्या संरक्षणात राजगादीवर बसवण्यात आले होते. परंतु 1849 मध्ये इंग्रजांनी शीख साम्राज्यावर कब्जा केला आणि त्यांच्याकडून कोहिनूर हिरा हिसकावून घेऊन त्यांना ब्रिटनला पाठवले. महाराजा दलीप सिंह यांनी भारतात परत येण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना नेहमीच नकार देण्यात आला. त्यांनी रशियाचा प्रवास करून तेथील झारला भारतावर ताबा असलेल्या इंग्रजांविरोधात हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

China Rain : चीनच्या युनेस्को वारसा स्थळी पर्यटकांची सुखरूप सुटका

महाराजा दिलीप सिंग फक्त दोनदाच भारतात आले .

महाराजा दलीप सिंह यांनी पंधरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर भारताचा केवळ दोनदाच दौरा केला. हे दोन्ही दौरे खूप छोटे होते आणि त्या दरम्यान त्यांच्यावर अनेक प्रकारच्या बंदीही होत्या.त्यांचा पहिला दौरा 1860 मध्ये त्यांच्या आईला इंग्लंडला घेऊन जाण्यासाठी झाला होता.
दुसरा दौरा 1863 मध्ये त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी झाला.महाराजा दलीप सिंह यांच्याबत ब्रिटिश सरकार इतके कडक होते की मृत्यूच्या वेळीही त्यांना भारतात येऊ दिले नाही.
महाराजा दलीप सिंह यांचे 1893 मध्ये 55 व्या वर्षी पॅरिसमध्ये निधन झाले.खूपच दुर्दैवी आयुष्य होते . कोहिनूर सोबत त्यांचे राज्यही गेले आणि शेवटपर्यंत मायदेशी परत येऊ शकले नाहीत.

ब्रेनवॉश करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली

असे म्हटले जाते की महाराजा दलीप सिंह यांचे लहान वयातच ब्रेनवॉश करण्यात आले आणि 1853 मध्ये त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. परंतु त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर ते पुन्हा शीख झाले.महाराजा दलीप सिंह यांनी 25 वर्षांच्या वयात सफोक येथे एल्वडेन हॉल नावाचे घर विकत घेतले आणि त्यांच्या पहिल्या पत्नी बाम्बा मुलर यांच्यासोबत तिथे स्थायिक झाले. बाम्बा मुलर जर्मन आणि एबिसिनियन वंशाच्या होत्या. या जोडप्याला सहा मुले होती आणि बैंस यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आवडती राजकुमारी कॅथरीन होती.खरंच वेदनादायक आहे bhai… लहानपणी राज्य, धर्म आणि देश तिन्ही हिरावून घेतले गेले.

Breaking News : POK मध्ये पाकिस्तान विरोधात बंड , JAAC ने निवडणुकांवर केला बहिष्कार

कोहिनूर हिऱ्याचे शेवटचे वारसदार

महाराजा दलीप सिंह हे कोहिनूर हिऱ्याचे शेवटचे वारसदार होते. महाराजा दलीप सिंह यांचे वडील महाराजा रणजित सिंह यांच्या खजिन्यात जगातील सर्वात प्रसिद्ध कोहिनूर हिरा होता. महाराजा रणजित सिंह यांच्या निधनानंतर हा कोहिनूर हिरा महाराजा दलीप सिंह यांना मिळाला. तथापि, त्यावेळी पंजाब आणि कोहिनूर हिऱ्यावर इंग्रजांची नजर होती. महाराजा रणजित सिंह यांच्या निधनानंतर लगेचच इंग्रजांनी पंजाबवर हल्ला करून त्यावर पूर्णपणे ताबा मिळवला.29 मार्च 1849 रोजी इंग्रजांनी 10-11 वर्षांच्या महाराजा दलीप सिंह यांच्याकडून एका तहावर स्वाक्षरी करून घेतली. त्यानुसार दलीप सिंह यांना आपली गादी सोडावी लागली आणि शीख साम्राज्यावर इंग्रजांचे राज्य झाले. त्यांना कोहिनूर हिरा महाराणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून देण्यास भाग पाडण्यात आले.10 वर्षांच्या मुलाकडून संपूर्ण राज्य आणि जगातील सर्वात मौल्यवान हिरा हिसकावून घेणे… हा इतिहासातील सर्वात मोठा अन्याय होता .कोहिनूर आजही ब्रिटनच्या रॉयल क्राउनमध्ये आहे

Web Title: British raj duleep singh the last maharaja of punjab who was not permitted to leave britain after the british had wrested the koh i noor from him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • British
  • London
  • Punjab

संबंधित बातम्या

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप
1

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.