Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत कॅनडा तणावात वाढ! कॅनडाचा भारतीय दूतावासाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा देण्यास नकार; अनेक शिबिरे रद्द

कॅनडातील भारतीय दूतावासांनी आयोजित केलेली कॉन्सुलर कॅम्प शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. यामागचे कारण म्हणजे कॅनडाने शिबिरांना सुरक्षा देण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 07, 2024 | 06:34 PM
भारत कॅनडा तणावात वाढ! कॅनडाचा भारतीय दूतावासाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा देण्यास नकार; अनेक शिबिरे रद्द

भारत कॅनडा तणावात वाढ! कॅनडाचा भारतीय दूतावासाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा देण्यास नकार; अनेक शिबिरे रद्द

Follow Us
Close
Follow Us:

टोरंटो: कॅनडातील भारतीय दूतावासांनी आयोजित केलेली कॉन्सुलर कॅम्प शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. यामागचे कारण म्हणजे कॅनडाने शिबिरांना सुरक्षा देण्यास नकार दिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने नियोजित शिबिरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सींनी या शिबिरांना किमान सुरक्षा पुरविण्यात असमर्थता व्यक्त केली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

भारतविरोधी हिंसक घटनांमुळे सुरक्षा चिंतेत वाढ

टोरंटो आणि व्हँकुव्हरमध्ये दूतावासांनी स्थानिक सहकार्याने भारतीय नागरिकांसाठी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये भारतीय नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र तसेच इतर सुविधांची सोय करण्यात आली होती. परंतु, काही अलीकडील घटनांमध्ये भारतविरोधी अतिरेक्यांनी हिंसाचार घडवून आणल्याने सुरक्षा चिंतेत वाढ झाली आहे. ब्रॅम्प्टन येथे हिंदू सभा मंदिर संकुलात हिंसक घटना घडली होती. या ठिकाणी काही अतिरेक्यांनी महिलां, लहान मुले, आणि वृद्धांवर हल्ला केला. त्यामुळे सुरेक्षेची मागणी करण्यात आली होती. मात्र, कॅनडाच्या सुरक्षा कंपन्यांनी नकार दिला. यामुळे शिबिरे रद्द करण्यात आली.

कॅनडाने व्हिएन्ना करार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न केल्याचे भारताचे मत

कॅनडाने व्हिएन्ना करार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न केल्याचे भारताने मत मांडले आहे. भारतीय मुत्सद्दींवर लक्ष ठेवण्याच्या घटनांनी दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढत चालला आहे. भारताने कॅनडा सरकारकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे. भारतीय दूतावासाच्या मते, असे शिबिरे रद्द करणे अत्यंत खेदजनक असून भारतीय नागरिक आणि अर्जदारांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा- ‘कॅनडातील हिंसाचार विरोधात कठोर कारवाई करा’; पंजाब समाजाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री मान यांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी व्हँकुव्हर आणि सरे येथे आयोजित शिबिरांना व्यत्यय आल्याचेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. भविष्यातील शिबिरांचे आयोजन कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्था योग्यरित्या सुनिश्चित झाल्यासच करण्यात येईल, असेही सांगितले.

दोषींवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्री मान यांची मागणी

कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे शीख फुटीरतावाद्यांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी मंदिरात घुसून हिंदूंना लाठीमार केला. त्यानंतर या प्रकरणावर भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. तसेच त्यांनी केंद्र सरकारने कॅनडाच्या सरकारशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

पंतप्रधान मोदींनी देखील हल्ल्याचा निषेध केला

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचा हा चुकीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून न्यायाची आशा व्यक्त केली. कॅनडात राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल भारत सरकार गंभीर चिंता व्यक्त करत आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत.

हे देखील वाचा- पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! विजयाबद्दल कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा

Web Title: Canadas refusal to provide security at indian embassy events nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • Canada
  • india
  • world

संबंधित बातम्या

PM Kisan: होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार का? काय आहे अपडेट ?
1

PM Kisan: होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार का? काय आहे अपडेट ?

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट
2

Kolkata Earthquake: कोलकाता, सिक्कीममध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?
3

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?

IMD Alert:  260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट
4

IMD Alert: 260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.