Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तर भारताने पाकिस्तानचा सर्वनाशच केला असता…’ इंडोनेशियात Indian Navyचे कॅप्टन शिव कुमार यांचा महत्त्वाचा खुलासा

India Pakistan nuclear crisis : भारत-पाकिस्तान दरम्यान अलीकडे घडलेल्या संघर्षात, जर पाकिस्तानने अणुबॉम्बचा वापर केला असता, तर भारताने त्याला नकाशावरून पुसून टाकले असते खुलासा भारतीय नौदलाने केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 29, 2025 | 02:39 PM
India Pakistan nuclear crisis

India Pakistan nuclear crisis

Follow Us
Close
Follow Us:

India Pakistan nuclear crisis : भारत-पाकिस्तान दरम्यान अलीकडे घडलेल्या संघर्षात, जर पाकिस्तानने अणुबॉम्बचा वापर केला असता, तर भारताने त्याला नकाशावरून पुसून टाकले असते, असा धक्कादायक खुलासा इंडोनेशियातील भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे. इंडोनेशियन वायुसेना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या चर्चासत्रात भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार यांनी ही माहिती उघड केली.

भारताचे अणु धोरण, हवाई सामर्थ्य आणि पाकिस्तानविरुद्ध चालवलेले ऑपरेशन सिंदूर यावर सविस्तर चर्चा या चर्चासत्रात झाली. यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अकरा हवाई तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि भारताच्या धोरणात्मक संयमाचे कौतुक करण्यात आले.

पाकिस्तानने अणुबॉम्ब वापरला असता तर…

कॅप्टन शिव कुमार यांनी ठामपणे सांगितले, “जर पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला केला असता, तर भारताने पाकिस्तानचा संपूर्ण नाश केला असता. हे आमच्या अणु धोरणाचे स्पष्ट धोरण आहे.” त्यांच्या या विधानाने उपस्थित संरक्षण तज्ज्ञ आणि श्रोते अचंबित झाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, भारत फक्त अणुब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही, तर अशा प्रसंगी तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध आहे. या विधानानंतर भारताच्या ‘नो फर्स्ट युज’ (NFU) धोरणाच्या कठोरतेची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

ऑपरेशन सिंदूर: रणनीती, तंत्रज्ञान आणि अचूकतेचा परिचय

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक प्रेसिजन-गाईडेड क्षेपणास्त्रे, स्टेल्थ ड्रोन आणि रेडिएशन-विरोधी शस्त्रसामग्री यांचा वापर करण्यात आला होता. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर तणाव निर्माण झाला. नूर खान (चकलाला, रावळपिंडी), रफीकी (शोरकोट), आणि भोलारी यांसारख्या तळांवर भारतीय हल्ले इतके अचूक होते की पाकिस्तानी विमाने उड्डाण करु शकली नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके, अनोखा खुलासा आला समोर

इंडोनेशियातील तज्ज्ञांचा भारताला पाठिंबा

इंडोनेशियन हवाई दल आणि सुरक्षा तज्ज्ञांनी भारताच्या संयमाचे आणि सामर्थ्याचे कौतुक करताना म्हटले की, भारताने अणु मर्यादांच्या खाली राहून अत्यंत संतुलित आणि परंतु परिणामकारक प्रतिसाद दिला. युद्ध पूर्णपणे नियंत्रणात ठेवत, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले धैर्य, बुद्धिमत्ता आणि लष्करी क्षमता दाखवली आहे.

राजकीय धोरणांची ठाम भूमिका

या चर्चासत्रात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानाचीही चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की, “भारत दहशतवादी कारवायांना युद्ध समजेल.” यामुळे भारताच्या नव्या लष्करी आणि कूटनीतिक धोरणाची ठळक झलक मिळाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Aid Leverage Israel : नेतन्याहूंवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यावरून ट्रम्प पुन्हा संतापले, इस्रायलकडून केली ‘मोठी मागणी’

भारताची स्पष्ट भूमिका आणि शक्तिशाली संदेश

भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या या विधानांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. भारत आता केवळ संयमित देश राहिलेला नाही, तर त्याने स्वतःची सामर्थ्यसंपन्न अणुशक्ती म्हणून ओळख निर्माण केली आहे. पाकिस्तानसारख्या देशांनी वारंवार अणुबॉम्बची धमकी दिल्यास भारत त्याला केवळ तोंडी उत्तर न देता, प्रत्यक्ष कृतीने प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे. इंडोनेशियातील या खुलाशामुळे भारताच्या लष्करी धोरणांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक विश्वास निर्माण होतोय आणि शेजारी देशांसाठी हा स्पष्ट इशारा देखील आहे.

Web Title: Had pakistan used nukes india wouldve wiped it out capt shiv kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Indian Navy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.