Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCO शिखर परिषदेत भारताने मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या मुख्य गोष्टी

शांघाय कोऑपरेशन समिट ( SCO) बैठक काल (दि. 16) पाकिस्तनच्या इस्लामाबादमध्ये पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारताने या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्यांकडे इतर देशांचे लक्ष वेधले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 17, 2024 | 10:41 AM
SCO शिखर परिषदेत भारताने मांडले 'हे' महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या मुख्य गोष्टी

SCO शिखर परिषदेत भारताने मांडले 'हे' महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या मुख्य गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: शांघाय कोऑपरेशन समिट ( SCO) बैठक काल (दि. 16) पाकिस्तनच्या इस्लामाबादमध्ये पार पडली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीत SCO च्या प्रमुख कागदपत्रांवर सर्व सदस्य देशांनी स्वाक्षरी केल्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारताने या चर्चेत सकारात्मक आणि रचनात्मक योगदान दिले, तसेच काही महत्त्वाचे मुद्यांकडे इतर देशांचे लक्ष वेधले.

हे महत्त्वाचे मुद्दे भारताने परिषदेत मांडले

भारताने “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या वैश्विक कल्पनेवर आधारित संवाद विकसित करण्यावर भर दिला. तसेच, SCO स्टार्टअप फोरम, स्टार्टअप्ससाठी विशेष कार्य गट (SWG), नवकल्पना आणि पारंपारिक औषध यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमांना इतर देशाच्या प्रतिनिधींनी समर्थन दिले. भारताच्या प्रयत्नांमुळे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) आणि डिजिटल समावेश हे SCO सहकार्याच्या फ्रेमवर्कचा भाग बनेल असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. तसेच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची (UNSDGs) पूर्तता करण्यासाठी मिशन लाइफकडून प्रेरणा घेण्याचा प्रस्ताव परिषदेत मांडला.

हे देखील वाचा- पेट्रोल टँकरचा अपघात, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी; अचानक झाला स्फोट अन् 94 जणांचा मृत्यू

जागतिक अन्नसुरक्षा आणि पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी, भारताने हवामानास अनुकूल आणि पौष्टिक धान्ये, विशेषतः बाजरीचा वापर वाढवण्यावर भर दिला.  याशिवाय, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून निष्पक्ष आणि संतुलित कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचा विकास करण्यावरही भर दिला. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांवर आधारित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय संरक्षणवादी धोरणे व व्यापार निर्बंधांना विरोध दर्शवला. याच वेळी भारताने SCO च्या पुढील अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल रशियाचे अभिनंदन केले आणि आगामी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

पाकिस्तान आणि चीनला संदेश

या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला म्हटले की, विश्वास, सहकार्य आणि चांगल्या शेजारीपणाच्या अभावामुळे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. SCO (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना, त्यांनी मैत्री आणि परस्पर विश्वासाच्या महत्त्वावर जोर दिला. जयशंकर यांनी सांगितले की, संघटनेचा उद्देश प्रादेशिक सहकार्य वाढवणे, समतोल विकास साधणे आणि संघर्ष टाळणे हा आहे. SCO चार्टरनुसार, मुख्य आव्हाने दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी यांचा सामना करण्यासाठी संघटना वचनबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. या सहकार्यामुळे एकात्मतेचे फायदे मिळू शकतात.

हे देखील वाचा- SCO Summit: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सुनावले खडे बोल, म्हणाले…

Web Title: Important issues raised by india at sco summit nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • China
  • india
  • pakistan

संबंधित बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
1

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
4

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.