Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जर अमेरिका दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान…’ भारतीय राजदूत जेपी सिंह नक्की काय म्हणाले?

India Pakistan relations : इस्रायलमध्ये भारताचे राजदूत जेपी सिंह यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली. पाहा नक्की काय म्हणाले ते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 20, 2025 | 11:47 AM
India can't trust Pakistan as 26/11 masterminds roam free JP Singh

India can't trust Pakistan as 26/11 masterminds roam free JP Singh

Follow Us
Follow Us:

India Pakistan relations : दहशतवादाविरोधात लढणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला आहे. इस्रायलमध्ये भारताचे राजदूत जेपी सिंह यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली आणि म्हटले की, “जेव्हा अमेरिका दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देऊ शकते, तेव्हा पाकिस्तान हाफिज सईद, लख्वी आणि साजिद मीर यांना का सोपवत नाही?”

मुंबई हल्ल्याच्या संदर्भाने दहशतवाद्यांविरोधात भारताने उचललेल्या कारवाया, आणि त्या मागे असलेल्या कट्टरवादी संघटनांची पाकिस्तानकडून होणारी सरंक्षण व्यवस्था यावर प्रकाश टाकताना राजदूत सिंह यांनी स्पष्ट सांगितले की, “लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद हे भारतात झालेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांचे नेते आजही पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत आहेत.”

“ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपलेले नाही”

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, “दहशतवाद्यांनी लोकांना मारण्याआधी त्यांचा धर्म विचारला आणि निर्दोष नागरिकांचा बळी घेतला. आमच्या कारवायांचा उद्देश फक्त दहशतवादी गट व त्यांच्या पायाभूत सुविधांचा नायनाट करणे हा होता. त्यावर पाकिस्तानने हल्ले करून उत्तर दिले.” ते पुढे म्हणाले, “आपली लढाई दहशतवाद्यांविरुद्ध आहे आणि ती सुरूच राहणार. युद्धबंदी अद्याप सुरू आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही. ही भारताची नवी सामान्यता आहे. आक्रमक रणनीती. दहशतवादी कुठेही असले तरी त्यांचा खात्मा होणारच.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकीकडे लष्करप्रमुखांना धमकावत होते युनूस, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमेरिकेने दाखवलेले उदाहरण आणि पाकिस्तानची निष्क्रियता

अमेरिकेने अलीकडेच मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला भारताच्या ताब्यात दिले आहे. त्याचा उल्लेख करत राजदूत सिंह म्हणाले, “अमेरिका हे करू शकते, तर पाकिस्तान का नाही? त्यांनी फक्त हाफिज सईद, लख्वी आणि साजिद मीर यांना आमच्या स्वाधीन करावे. यामुळे न्यायाच्या प्रक्रियेला चालना मिळेल आणि दहशतवाद्यांवर अंकुश बसेल.” मुंबई हल्ल्यात अनेक यहुदी नागरिकांचे मृत्यू झाल्याची आठवण करून देत त्यांनी इस्रायलच्या व्यासपीठावरून पाकिस्तानला झणझणीत सुनावले. “ही केवळ भारताचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे.”

पाकिस्तानच्या चौकशीच्या ‘ऑफर’वर उपहास

पाकिस्तानने अलीकडे पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी सहकार्याची इच्छा व्यक्त केली. यावर टीका करत राजदूत सिंह म्हणाले, “मुंबई, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यांच्या बाबतीत पाकिस्तानने चौकशीचं नाटक केलं. आम्ही त्यांना पुरावे, तांत्रिक माहिती, आणि जागतिक समुदायाचा पाठिंबाही दिला – तरीही त्यांनी काहीच केलं नाही.”

दहशतवादाविरोधात जागतिक युतीची गरज

राजदूत जेपी सिंह यांनी ठामपणे सांगितले की, “दहशतवाद केवळ एका देशाचा प्रश्न नाही. भारत, इस्रायल आणि इतर त्रस्त देशांनी एकत्र येत दहशतवादी संघटनांवर आणि त्यांच्या समर्थकांवर आघात करणारी आंतरराष्ट्रीय युती तयार केली पाहिजे.” त्यांनी पुढे म्हटले, “जगातील दहशतवादी कारवायांमागे जे राष्ट्रे आश्रय देतात, त्यांना रोखणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके दहशतवाद्यांचा नायनाट करणे. केवळ कारवाई करून नव्हे, तर एकत्रित राजनैतिक आणि लष्करी दबाव निर्माण करूनच ही लढाई आपण जिंकू शकतो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Government: ‘आता दारूपासून सिगारेटपर्यंत…’ पाकिस्तानचे खिसे भरताना चीनवर गरिबीचे सावट

भारतीय राजदूत जेपी सिंह

भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या कोणत्याही राष्ट्रावर भारत गप्प बसणार नाही. दहशतवादाविरोधात केवळ सैनिकी नव्हे तर राजनैतिक, आंतरराष्ट्रीय आणि नैतिक पातळीवरही भारत आक्रमक पवित्रा घेणार आहे. “आता केवळ कारवाईच नव्हे, तर जबाबदारी आणि न्याय हवा आहे”. असा ठाम संदेश त्यांनी जागतिक समुदायाला दिला आहे.

Web Title: India cant trust pakistan as 2611 masterminds roam free jp singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • india
  • international news
  • Israel
  • pakistan

संबंधित बातम्या

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा
1

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?
2

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल
3

Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला
4

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.