Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या कारवाईच्या संकेताने पाकिस्तान हादरला; संरक्षण मंत्र्यांचा इशारा, सिंधू पाणी करारावरही चिंता

India suspends Indus Waters Treaty : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आणि याचे परिणामही पाहायला मिळत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2025 | 09:15 AM
India hints at action Pakistan alarmed Defense Minister warns Indus Treaty concerns rise

India hints at action Pakistan alarmed Defense Minister warns Indus Treaty concerns rise

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताने स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी दर्शवली असून, त्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत भारताला इशारा दिला आहे. भारताच्या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सिंधू पाणी करार आणि भारताच्या धोरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

भारताचे पहिले पाऊल आणि पाकिस्तानचा तणाव

भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले असून, पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा थांबवण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच भारतीय हवाई दलाची हालचाल पाहता कोणत्याही क्षणी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्यामुळे पाकिस्तानमध्ये एक प्रकारची भीतीची लाट पसरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाला मिळाला पुतिनचा उत्तराधिकारी? समोर आला व्लादिमीरचा 10 वर्षांचा गुप्त वारसदार

ख्वाजा आसिफ यांचा भारताला इशारा

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले की, “पाकिस्तान कोणत्याही आक्रमकतेला योग्य उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आम्ही भारतासोबत सामान्य संबंध ठेवू इच्छितो, परंतु जर चिथावणी दिली गेली, तर आम्ही शांत बसणार नाही.” त्यांनी हेही म्हटले की, “भारतानं शत्रुत्वाची भूमिका घेतली, तर आम्ही ‘अभिनंदन प्रकरणा’प्रमाणेच प्रत्युत्तर देऊ.”

आसिफ यांनी पुढे बोलताना सांगितले की, “भारत बराच काळ सिंधू पाणी करारातून माघार घेण्याचा विचार करत आहे. जर भारताने पाण्याचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला, तर ते आंतरराष्ट्रीय कराराचा भंग ठरेल.” जागतिक बँक हा कराराचा हमीदार असल्याने भारत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

PAHALGAM TERROR ATTACK | INDIA HITS BACK Indus Waters Treaty SUSPENDED after 64 years. 80% of Pakistan’s farmland, major cities like Karachi & Lahore, and key hydropower plants like Tarbela & Mangla: all at risk. Terror has a price. Water is just the start. pic.twitter.com/SKsIuCaKJk — زماں (@Delhiite_) April 23, 2025

credit : social media

राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आणि सिंधू करार

पाकिस्तान सरकारने या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सिंधू पाणी करार हा सर्वोच्च अजेंडा असेल, अशी माहिती ख्वाजा आसिफ यांनी दिली. “राष्ट्रीय अस्मितेच्या प्रश्नावर पाकिस्तान एकदिलाने उभा राहील,” असे सांगून त्यांनी देशातील सशस्त्र दलांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही नमूद केले.

भविष्यातील संघर्षाच्या शक्यतेने चिंतेचे वातावरण

दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे स्पष्ट होत आहे. भारताची आक्रमक भूमिका आणि पाकिस्तानची तत्काळ प्रतिक्रिया, हे दोन्ही देश आता पुन्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, याचे संकेत आहेत.

विशेष म्हणजे, भारताच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा थांबवण्याची शक्यता पाकिस्तानसाठी गंभीर संकट ठरू शकते, आणि त्यामुळेच त्यांचे सरकार जागतिक पातळीवर हस्तक्षेपाची अपेक्षा ठेवून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यामागे TRFचे ‘फाल्कन स्क्वॉड’ असल्याचा दावा; भविष्यात काश्मीरसाठी बनू शकते डोकेदुखी

भारताच्या धोरणिक पावलांचा प्रभाव वाढतोय

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर जे कठोर निर्णय घेतले आहेत, त्यांचा पहिला परिणाम पाकिस्तानवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सिंधू पाणी कराराच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे, आणि पाकिस्तानचे आक्रमक विधान हे भारताच्या नवे धोरण प्रभावी ठरत असल्याचे संकेत देत आहे. पुढील काळात भारत-पाकिस्तान संबंध कोणत्या वळणावर जातात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट निश्चित – भारत आता संयम ठेवूनही शक्तिशाली उत्तर देण्यास तयार आहे.

Web Title: India hints at action pakistan alarmed defense minister warns indus treaty concerns rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • pahalgam
  • Pahalgam Terrorist Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

Diplomatic War: ‘दलाल’ म्हणून जयशंकर यांनी काढली पाकिस्तानची इज्जत; इस्लामाबादचा झाला तीळपापड, म्हटले-‘कमजोर असल्याबद्दल…’
1

Diplomatic War: ‘दलाल’ म्हणून जयशंकर यांनी काढली पाकिस्तानची इज्जत; इस्लामाबादचा झाला तीळपापड, म्हटले-‘कमजोर असल्याबद्दल…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.