Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India warns Pakistan : पहलगाम हल्ल्यांनंतर भारताने प्रथमच साधला पाकिस्तानशी थेट संवाद; दिला सावधानतेचा इशारा

Tawi River flood alert : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानशी संवाद साधला आहे. इस्लामाबादला माहिती देताना भारताने सांगितले की जम्मूमधील तावी नदीत मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 25, 2025 | 12:40 PM
India warned Pakistan after the Pahalgam attack of possible major Tawi river floods causing heavy losses

India warned Pakistan after the Pahalgam attack of possible major Tawi river floods causing heavy losses

Follow Us
Follow Us:

India warns Pakistan : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी गडद झाला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शेजारील देशाला गंभीर इशारा दिला आहे. जम्मूतील तावी नदीला पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून त्याचे परिणाम थेट पाकिस्तानातही जाणवतील, अशी माहिती भारत सरकारने इस्लामाबादला दिली आहे. भारताच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सिंधू पाणी करार स्थगिती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’

पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. या कराराच्या माध्यमातून भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानात जात असते. त्यामुळे या करारावरील स्थगितीमुळे पाकिस्तानला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, भारताने पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानशी थेट संवाद साधला. मात्र हा संवाद दहशतवादाविरुद्ध नव्हता, तर पूराच्या संभाव्य धोक्याबाबत शेजाऱ्याला सावध करण्यासाठी होता. या निर्णयामुळे भारताने स्पष्ट संदेश दिला की, राजकीय आणि लष्करी संघर्ष वेगळा असला तरी मानवतेच्या रक्षणासाठी भारत कधीही मागे हटणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…

भारताचा स्पष्ट संदेश: दहशतवाद थांबवा!

भारतातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला सांगण्यात आले आहे की जोपर्यंत ते सीमापार दहशतवाद थांबवण्यासाठी ठोस पावले उचलत नाहीत, तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहील. यामुळे पाकिस्तानची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पाकिस्तानने या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयात धाव घेतली असली तरी भारताने ठामपणे सांगितले आहे की हा विषय द्विपक्षीय चर्चेपुरताच मर्यादित आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेचा निर्णय स्वीकारण्याची भारताची तयारी नसल्याचेही भारताने स्पष्ट केले.

पाकिस्तानात पुराचे संकट

दरम्यान, पाकिस्तानात सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब प्रांतात पाऊस आणखी ४८ तास सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी सिंधू, चिनाब, रावी, सतलज आणि झेलम या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानातील पंजाब आपत्कालीन बचाव सेवा ११२२ चे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत कसूर, ओकारा, पाकपट्टण, बहावलनगर आणि वेहारी या जिल्ह्यांमधील अनेक खेड्यांमधून २०,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाणी शिरल्यामुळे अनेक गावे पूर्णपणे वेढली गेली असून नागरिकांना सततच्या भीतीत दिवस काढावे लागत आहेत.

भारताची ‘मानवतेची बाजू’

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली असली तरी, सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दिलेला हा पूर इशारा भारताच्या जबाबदार धोरणाचे उदाहरण ठरला आहे. मानवतेच्या प्रश्नावर भारत कधीही तडजोड करणार नाही, असा संदेश या निर्णयातून दिला गेला आहे. यामुळे एका बाजूला पाकिस्तानवर दहशतवाद रोखण्याचा दबाव वाढला आहे, तर दुसऱ्या बाजूला पूरस्थितीमुळे तेथील सरकार अडचणीत सापडले आहे. भारताकडून मिळालेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानच्या प्रशासनात घबराट पसरली असून, तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आमचे भविष्य, आम्हीच ठरवणार…’ युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; स्वातंत्र्यदिनानिमित्त झेलेन्स्कीचा निर्भीड संदेश

दहशतवादाविरुद्ध लढा

सध्या भारत-पाकिस्तान संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. पहलगाम हल्ल्यामुळे निर्माण झालेला अविश्वास वाढतच चालला आहे. अशा वेळी भारताने पूराचा इशारा देऊन दाखवून दिले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढा आणि मानवतेचा विचार – हे दोन्ही एकत्र शक्य आहेत. या कृतीतून पाकिस्तानला केवळ कठोर संदेशच मिळाला नाही तर जगासमोर भारताची संवेदनशील बाजूही अधोरेखित झाली आहे.

Web Title: India warned pakistan after the pahalgam attack of possible major tawi river floods causing heavy losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • flood
  • india
  • India pakistan Dispute
  • pakistan

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
4

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.