
indian navy operation sindhu 2 0 karachi port pakistan blockade 2026
Operation Sindhu 2.0 Indian Navy : भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात नौदलाने नेहमीच शांत राहून शत्रूला पाणी पाजले आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अरबी समुद्रात ज्या हालचाली सुरू आहेत, त्या पाहता ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ आता केवळ चर्चा राहिलेली नाही, तर तो एक अटळ इशारा बनला आहे. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन महाकाय विमानवाहू युद्धनौकांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाचा पश्चिम ताफा पाकिस्तानच्या मकरान किनाऱ्याजवळ तळ ठोकून आहे. १९७१ मध्ये ज्याप्रमाणे कराची बंदर सात दिवस जळत होते, तशीच काहीशी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर
गेल्या काही तासांत भारतीय नौदलाने मकरान किनाऱ्याजवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह अनेक घातक शस्त्रास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. विक्रांत कॅरियर बॅटल ग्रुपची (CBG) ही तैनात केवळ सराव नसून, शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून दिलेला इशारा आहे. उपग्रह प्रतिमांनुसार (Satellite Imagery), भारतीय नौदलाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी नौदलाची जहाजे कराची बंदर सोडून ग्वादरच्या दिशेने पळाली आहेत, तर काही इराणी सागरी हद्दीत लपण्याचा प्रयत्न करत आहेत.
THREAD🧵 Operation Sindoor: Unfolding of events, Minute by Minute Day 3: May 9, 2025 – The Drone Duels and Maritime Posturing The third day was characterized by intense “drone duels” and the forward deployment of the Indian Navy to enforce a strategy of maritime compellence.… https://t.co/OnFLK336M0 — Netram Defence Review (@NetramDefence) May 9, 2026
credit – social media and Twitter
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्याशी साधलेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “यावेळी आम्ही तुमच्या तोंडातील घास हिसकावून घेतला, पण तुम्हाला दुसरी संधी नक्की मिळेल,” असे मोदींनी म्हटले होते. हे विधान नौदलासाठी एक ऊर्जा देणारे ठरले आहे. व्हाईस ॲडमिरल प्रमोद सिंग यांनीही स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने पुन्हा कुरापत केली, तर यावेळी हवाई दल नाही, तर नौदल पहिले आक्रमण करेल आणि यावेळी केवळ तळे नाही, तर संपूर्ण बंदरे जळून खाक होतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर
पाकिस्तानला भारतीय नौदलाची भीती वाटण्यामागे ऐतिहासिक कारणे आहेत. १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पाकिस्तानची रसद तोडली होती. चित्तगोंग आणि कॉक्स बाजार उद्ध्वस्त केल्यानंतर नौदलाने कराचीच्या केमारी तेल विहिरींना लक्ष्य केले होते. तोच आक्रमकपणा आजच्या आधुनिक नौदलात दिसून येत आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात निलगिरी-श्रेणीच्या फ्रिगेट्स आणि अरिधमन ही अणु-पाणबुडी सामील झाल्यामुळे भारताची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या नौदलाची मर्यादित क्षमता यामुळे ते भारताच्या ‘ड्युअल कॅरियर’ (दोन विमानवाहू जहाजे) धोरणासमोर टिकू शकत नाहीत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केलेली नाकेबंदी इतकी कडक आहे की, पाकिस्तानला आपले इंधन आणि व्यापार वाचवण्यासाठी युद्धविरामाची याचना करावी लागली होती. तज्ज्ञांच्या मते, जर ऑपरेशन सिंदूर २.० सुरू झाले, तर पाकिस्तानचा समुद्रमार्ग पूर्णपणे बंद होईल, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था काही दिवसांतच कोलमडून पडेल.