Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरडा पडलाय पाकिस्तान; भारताच्या जलनीतीचा कसा पडला प्रभाव? पाहा Satellite Image

Pahalgam Terror Attack : भारताने पुलवामा (पहलगाम) हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर धोरणात्मक निर्णयांचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. भारताने गोळी न झाडता जलनीतीद्वारे पाकिस्तानला अडचणीत टाकले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 30, 2025 | 03:29 PM
India's water policy is drying up Pakistan satellite images show rising tensions

India's water policy is drying up Pakistan satellite images show rising tensions

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack : भारताने पुलवामा (पहलगाम) हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर धोरणात्मक निर्णयांचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, सियालकोटजवळ चिनाब नदीतील प्रवाह कमकुवत झाल्याचे उपग्रह प्रतिमांमधून समोर आले आहे. या बदलांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही राजकीय आणि लष्करी नेते युद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत.

भारताने विना गोळीबार पाकिस्तानला गुडघे टेकवले

2019 मधील पहलगाम (पुलवामा) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक रणनीती आखल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे सांगितले होते की, दोषींना त्यांच्या कल्पनेपेक्षा अधिक कठोर शिक्षा दिली जाईल. त्याच अनुषंगाने भारताने सिंधू पाणी कराराच्या अंमलबजावणीत बदल करत पाण्याचा प्रवाह रोखण्यास सुरुवात केली. यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये उगम पावणाऱ्या चिनाब नदीचा प्रवाह पाकिस्तानमध्ये कमी झाल्याचे उपग्रह चित्रांमधून दिसून येते. सियालकोटजवळ चिनाब नदीचा खळखळाट थांबल्याने स्थानिक शेती, जलपुरवठा आणि पर्यावरणीय संतुलनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या ‘डर्टी वर्क’च्या विधानावर अमेरिकेची प्रतिक्रिया; पाक आता जागतिक पातळीवर अडचणीत

चिनाब नदी कोरडी पडली, पाकिस्तानमध्ये चिंता वाढली

सध्या ज्या उपग्रह चित्रांचा संदर्भ दिला जात आहे, त्यानुसार चिनाब नदीचा प्रवाह अत्यंत मर्यादित झाला आहे, काही ठिकाणी तर संपूर्णपणे थांबला आहे. पाकिस्तानमध्ये यामुळे जलसंकट अधिक तीव्र झाले आहे. सिंधू पाणी करारात भारताने नद्यांवरील काही नियंत्रण राखले असून, भारताला पूर्व नद्यांवरील जलप्रवाह रोखण्याचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील काही राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धाचे निमित्त ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. भारताने पाण्याचा प्रवाह अडवल्यास, पाकिस्तानमध्ये अन्नधान्य टंचाई आणि सामाजिक असंतोष वाढू शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे.

#Satellite images don’t lie—Chenab near Sialkot is nearly dry. #India hasn’t broken the Indus Treaty but is using every legal right to harness OUR waters first. Strategic sovereignty in action. pic.twitter.com/W2FkZVYeTg — Yamini Patel (@yamini96_) April 30, 2025

credit : social media

भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य, धोरण आणि शक्ती दोन्ही सज्ज

हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने बैठक घेतल्या. त्यानंतर भारतीय लष्कराला “पूर्ण स्वातंत्र्य” देण्यात आले, म्हणजेच कुठलीही कारवाई करण्यासाठी त्यांना स्वतंत्र अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे केवळ जलनीतीच नव्हे, तर लष्करी पातळीवरही भारत सज्ज आहे, हे जगजाहीर झाले आहे. भारताच्या या धोरणांमुळे पाकिस्तानवर दोन स्तरांवर दबाव निर्माण झाला आहे – एक आर्थिक व सामाजिक आणि दुसरा सामरिक. पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांची चिंता उघड आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत, संयम बाळगण्याचे आवाहन

या घडामोडींची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. इराण, अमेरिका, संयुक्त राष्ट्र यांसारख्या प्रमुख राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या याप्रकरणी कोणताही युद्धजन्य प्रकार उद्भवू नये, यासाठी कूटनीतिक चर्चा आणि संवाद आवश्यक असल्याचे जागतिक समुदाय मानतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पाकिस्तानी सेना बाबरी मशिदीची पहिली वीट रचेल… ‘ बिलावल भुट्टोनंतर पाकिस्तानच्या आणखी एका खासदाराने गरळ ओकली

 भारताच्या धोरणाने पाकिस्तानची कोंडी

भारताने गोळी न झाडता जलनीतीद्वारे पाकिस्तानला अडचणीत टाकले आहे. उपग्रह प्रतिमांमधून दिसणाऱ्या चिनाब नदीच्या कोरड्या प्रवाहाने या धोरणाचा यशस्वी परिणाम सिद्ध केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये वाढत्या जलटंचाईची समस्या निर्माण झाली असून, भविष्यात या संघर्षाचा केंद्रबिंदू “पाणी” ठरू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारत-पाक संबंधांमध्ये पाण्याचे राजकारण नव्या संघर्षाची नांदी ठरते का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Indias water policy is drying up pakistan satellite images show rising tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?
1

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू?; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले…
2

Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू?; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले…

Brazil Flood Fury: बापरे! पूर्ण शहर चिखलाखाली गाडलं गेलं; ब्राझीलच्या मिनास गेराईसमध्ये निसर्गाचा भयानक कोप
3

Brazil Flood Fury: बापरे! पूर्ण शहर चिखलाखाली गाडलं गेलं; ब्राझीलच्या मिनास गेराईसमध्ये निसर्गाचा भयानक कोप

Europe Nuclear Umbrella: अमेरिकेने साथ सोडली तरी भारताचा ‘हा’ मित्र देश जगाला वाचवणार; युरोपला पुरवणार अणुबॉम्बची छत्री
4

Europe Nuclear Umbrella: अमेरिकेने साथ सोडली तरी भारताचा ‘हा’ मित्र देश जगाला वाचवणार; युरोपला पुरवणार अणुबॉम्बची छत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.