Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

इराणने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री बंद केली आहे. फसव्या नोकऱ्या, मानवी तस्करी यांसारख्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 18, 2025 | 11:18 AM
Iran ban visa free entry for Indians over misuse by criminal elementary

Iran ban visa free entry for Indians over misuse by criminal elementary

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये भारतीयांना आता व्हिसा-फ्री एन्ट्री बंद
  • MAE ने अधिकृत निवेदन जारी करत कारण केले स्पष्ट
  • जाणून घ्या काय आहे कारण?

Iran Suspends Visa Free Entry to India : नवी दिल्ली/तेहरान : एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणने (Iran) भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री (Visa free Entry) बंद केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बनावट नोकऱ्या, फसवणूक आणि अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरपासून भारतीयांना इराणमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री बंद होणार आहे.

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

इराणने का केली भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री बंद? 

इराणने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री निलंबित केली आहे. बनावट नोकऱ्या, बेकायदेशीर प्रवास, तसेच नोकरीचे अमिष दाखवून भारतीयांच्या अपहरणाच्या घटाना वाढत चालल्या आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवदेन जारी केले आहे. या अधिकृत निवेदनानुसार, गुन्हेगारी नेटवर्कचा वाढता गैरवापर रोखण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना इशारा

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, २२ नोव्हेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांना इराणमध्ये प्रवेश घेण्यासाठी व्हिसाची आवश्यकता लागणार आहे. विना व्हिसा कोणत्याही परिस्थिती भारतीयांना इराणमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि व्हिसा-फ्री प्रवास टाळण्याचा. तसेच नोकरीच्या अमिषापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी देखील भारताने अनेक वेळा हा इशारा जारी केला होता.

MEA issues advisory on suspension of visa waiver facility extended to Indian nationals travelling to Iran “The attention of Government has been drawn to several incidents of Indian nationals being lured to Iran on false promises of employment or with assurances of onward transit… pic.twitter.com/lRUgKnX6LC — ANI (@ANI) November 17, 2025

यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये नोकरीचे अमिष दाखवून भारतीयांच्या अपहरणाची घटना समोर आली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार, मध्य पूर्वेतील किंवा इतर देशांमधील लोक भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवतात, त्यांना नोकरीसाठी बोलावतात. यानंतर त्यांना ओलिस ठेवले जाते. त्यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून संबंधित व्यक्तीला सोडण्यासाठी पैशाच्या मागणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये पैसे घेतल्यानंतर व्यक्तीला सोडले जात नाही, किंवा त्याची हत्या केली जाते. या घटनांमध्ये गेल्या काही काळात प्रचंड वाढ झाली होती.

गुजरातमधील अजयकुमार, चौधरी, प्रियाबेन चौधरी, अनिलकुमार चौधरी आणि निखिलकुमार चौधरी या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना बंधक बनवण्यात आले होते. एका एजंटमार्फत त्यांना बँकॉक, दुबईमार्गे त्यांना बोलवण्यात आले होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून २ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. सुदैवाने सरकारला याची माहिती मिळाली आणि या तरुणांची सुटका करण्यात आली. या घटनांमुळे भारतीय सरकारने व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला असल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताचा इराण-इस्रायलशी आहे ‘इतका’ मोठा व्यवसाय! युद्ध वाढले तर काय होईल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश का बंद केला?

    Ans: गेल्या काही काळात बनावट नोकऱ्या, फसवणूक आणि अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला आहे.

  • Que: भारतीयांसाठी इराणमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री कधीपासून बंद होणार आहे?

    Ans: इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला असून २२ नोव्हेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे.

  • Que: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना काय इशारा दिला आहे?

    Ans: भारत सरकारने नागरिकांना कोणत्या परदेशात प्रवास करण्यापूर्वी अधिकृत आणि विश्वासहार्य माध्यमांचा वापर करण्याचा, तसेच कोणत्या संशयास्पद किंवा नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या एजंटवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देऊ नये.

Web Title: Iran ban visa free entry for indians over misuse by criminal elementary mea issues advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Iran News
  • Visa free entry
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
1

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
2

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
3

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
4

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.