Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्ध न होता पराभव! पाकिस्तानच्या सैन्याला जबर धक्का; बलुच बंडखोरांकडून मंगोचरवर ताबा

Pakistan army setback : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये आधीच तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना, आता पाकिस्तानसाठी आणखी एक मोठा धक्का समोर आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 03, 2025 | 01:11 PM
Pakistan army suffers major setback Baloch rebels take control of Mangochar

Pakistan army suffers major setback Baloch rebels take control of Mangochar

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद/नई दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये आधीच तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना, आता पाकिस्तानसाठी आणखी एक मोठा धक्का समोर आला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मंगोचर शहरावर बलुच बंडखोरांनी ताबा घेतला असून, या चकमकीत पाकिस्तानच्या सैन्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

बलुच बंडखोरांनी सरकारी कार्यालये आणि सैनिकी छावण्यांवर हल्ला करत संपूर्ण शहरावर आपला प्रभाव प्रस्थापित केल्याचे दाखवणारा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हे सगळं अशा वेळी घडतंय, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत, आणि पाकिस्तानने भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पश्चिम सीमेवर सैन्याची मोठी हालचाल सुरू केली आहे.

मंगोचरमध्ये रक्तरंजित संघर्ष: पाक लष्करावर घातक हल्ला

बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने मंगोचरमधील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर थेट हल्ला केला. या हल्ल्यानंतर परिसरात भीषण गोळीबार आणि स्फोट झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सरकारी इमारतींवर बंडखोरांचे नियंत्रण स्पष्टपणे दिसून येत आहे.

या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे, तसेच बंडखोरांनी सैन्याची शस्त्रेही हस्तगत केल्याचे समजते. बीएलएच्या दाव्यानुसार, त्यांनी ५० सुरक्षा जवान ठार मारले असून २१४ ओलिसांची निर्घृण हत्या केली आहे. मात्र, पाकिस्तान सरकार या आकडेवारीचा निषेध करत असून केवळ १८ सैनिक आणि ३३ नागरी व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा दावा करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ची साखळी उलगडली; सौदी अरेबियाचा पाकिस्तानला गुप्त पाठिंबा, भारताला अण्वस्त्र धमकीचा गंभीर इशारा

पहलगाम हल्ल्यानंतरच्या तणावात पाकिस्तानसाठी डोकेदुखी

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन मैदानात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला, ज्यामध्ये एक स्थानिक मार्गदर्शकही होता. पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’ ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी आपली जबाबदारी नाकारली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हिंदूंविरोधी वक्तव्य केल्यानंतर अवघ्या आठवड्यात हा हल्ला झाला, त्यामुळे भारताने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले आहे.

बलुचिस्तानमध्ये उद्रेक, अंतर्गत अस्थैर्याची चिन्हं

गेल्या काही महिन्यांत बलुचिस्तानमध्ये बंडखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. २६ एप्रिल रोजी झालेल्या आयईडी स्फोटात १० निमलष्करी जवान ठार झाले होते, ज्याची जबाबदारी बीएलएनेच घेतली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता मंगोचरमध्ये थेट सैन्याविरुद्ध लढा उभारण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकिस्तान सरकारची धक्कादायक कमजोरी उघड झाली आहे. देशाच्या पश्चिम भागात इतक्या प्रमाणात सैन्याचा पराभव होणे, आणि शहरांवर बंडखोरांचा कब्जा होणे, ही पाकिस्तानसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्थिती

मंगोचरमधील घडामोडी आणि पहलगाम हल्ला या दोन्ही घटनांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक व लष्करी तणाव अधिकच तीव्र केला आहे. पाकिस्तानने भारताच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सीमेवर हालचाली सुरू केल्या असताना, बलुचिस्तानमधील अंतर्गत विद्रोहाने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरच मोठा प्रश्नचिन्ह लावले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली

शब्दशः युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचे सैन्य बलुचिस्तानमध्ये हरल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे, आणि यामुळे इस्लामाबादची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकच कमजोर झाली आहे. बलुचिस्तानातील बंडखोरी आणि पहलगाम हल्ला या दोन्ही घटनांनी दक्षिण आशियात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटवण्याचा धोका निर्माण केला आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष भारत-पाकिस्तान संबंधांवर आणि बलुच बंडखोरांच्या पुढील पावलांवर केंद्रित आहे.

Web Title: Pakistan army suffers major setback baloch rebels take control of mangochar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
1

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली
2

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले
3

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले

International Abilympics 2027: फिनलंडमधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारताची तयारी सुरू; राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
4

International Abilympics 2027: फिनलंडमधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारताची तयारी सुरू; राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.