Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 04, 2026 | 10:52 AM
India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा (फोटो-सोशल मीडिया)

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे सावट
  • पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली यांचा भारतावर आरोप 
  • भारत पुन्हा युद्धाची तयारी करत असल्याचा दावा
 

India-Pakistan Crisis: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान अद्यापही सावरलेला नाही. अशातच पाकला पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या अलीकडील एक विधानावरून हे स्पष्ट झाले आहे. आसिफ अली झरदारी यांनी दावा केला की, भारत “दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहे.” यामुळे पुन्हा भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा: Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत

पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान स्वतः दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. आपल्या अंतर्गत अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अफगाणिस्तान आपल्या भूभागावर आपले सार्वभौमत्व वापरत आहे यामुळे पाकिस्तान संतप्त आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला. पाकिस्तान नेहमी काहीतरी खुरापती करत असते. यामुळे ते स्वत: संकटांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येते. सध्या इराण-इस्राइल युद्ध तीव्र होताना दिसत असताना पाकिस्तानच्या या दाव्याने अजून कोणते नवे वळण येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा: स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले आहेत. परंतु,  संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानी राष्ट्रपती म्हणाले, “भारतीय नेते म्हणत आहेत की ते दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहेत. भारताला माझे सांगणे आहे की त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे. युद्ध हा पर्याय नाही. कारण प्रादेशिक सुरक्षेचा हा एकमेव मार्ग आहे.” जरदारी यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केल्याचा आरोप केला. झरदारी यांनी अफगाणिस्तानला सांगितले, “दुसऱ्या देशाच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःला युद्धभूमी बनवणे थांबवा. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pakistan president statement sparks new india war debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Opration Sindoor
  • Randhir Jaiswal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.