Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘PoK वरून ताबा हटवा… ‘ भारताचा पाकिस्तानला ठणकावून इशारा, नवीन वादाची ठिणगी पेटली

Pakistan on the issue of Jammu and Kashmir: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीर (PoK) तात्काळ रिकामे करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तान सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2025 | 11:23 AM
Pakistan slammed India's remark on removing control over PoK calling it an international dispute

Pakistan slammed India's remark on removing control over PoK calling it an international dispute

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) तात्काळ रिकामे करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तान सरकारने तीव्र संताप व्यक्त केला असून, हा एक आंतरराष्ट्रीय वाद असल्याचा दावा करत भारताच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावरून तीव्र वादंग निर्माण झाले आहे.

भारताचा स्पष्ट इशारा, पीओकेवर बेकायदेशीर कब्जा स्वीकार्य नाही

गेल्या गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक ठाम भूमिका घेत पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारे परकी हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. पाकिस्तानशी आमचा एकमेव संबंध म्हणजे त्यांनी बेकायदेशीररित्या व्यापलेले पीओके रिकामे करावे.”

त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानालाही प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची ‘गळा रक्तवाहिनी’ असे संबोधले होते. जयस्वाल म्हणाले, “कोणत्याही परदेशी गोष्टीला ‘गळ्याची नस’ कशी म्हणता येईल? भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपाचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘सर्वांचे रडगाणे ऐकणार नाही…’ टॉप 15 अर्थव्यवस्थांशीच चर्चा करणार: डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानचे प्रत्युत्तर, काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वाद

भारतीय वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन जारी केले. त्यांनी भारताचे वक्तव्य ‘खोटे आणि निराधार’ असल्याचे सांगत, जम्मू-काश्मीर हे “संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार एक वादग्रस्त क्षेत्र” असल्याचा पुनरुच्चार केला. पाक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “काश्मीरचा अंतिम निर्णय काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार होणे आवश्यक आहे. भारताने अशी विधाने न करता या प्रश्नावर शांततामूलक तोडगा शोधावा.”

🇮🇳 Pakistan will have to vacate Pakistan-occupied Kashmir! India responds strongly to Pak Army Chief’s remarks. “POK won’t be freed just by words — force may be needed. The real question is: when will India act?” 💥#AsimMunirpic.twitter.com/fwXTagDJuU — Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025

credit : social media

जनरल असीम मुनीर यांचे पाकिस्तानमधील भावना भडकवणारे विधान

पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधताना म्हटले होते की, “भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे देश आहेत. आपण एक कधीच नव्हतो. पाकिस्तानसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे, आणि देशाच्या रक्षणाचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे.” त्यांनी काश्मीरला ‘पाकिस्तानची गळा रक्तवाहिनी’ असे संबोधले, ज्यावर भारताने तीव्र शब्दांत प्रतिक्रीया दिली आणि त्याला “अस्वीकार्य हस्तक्षेप” म्हणत झिडकारले.

 काश्मीर प्रश्नावर कायम असलेले तणावाचे वातावरण

काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 पासून तीन युद्धे होऊन गेली आहेत. भारताने 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यानंतरपासून पाकिस्तानकडून सातत्याने जागतिक पातळीवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, “जम्मू-काश्मीर हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे आणि पीओकेवर पाकिस्तानचा कब्जा बेकायदेशीर आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गीता, नाट्यशास्त्र युनेस्कोच्या यादीत; मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश भारतीय वारशाच्या 14 नोंदी

 दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव शिगेला

भारताच्या ‘पीओके रिकामे करा’ या स्पष्ट भूमिकेमुळे आणि पाकिस्तानच्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पाकिस्तान काश्मीरला आंतरराष्ट्रीय वाद ठरवत असेल, तरी भारत या भूमिकेला फेटाळून, आपल्या सार्वभौमत्वाचा पुनरुच्चार करत आहे. येत्या काळात या वादाचे रूपांतर आणखी मोठ्या राजनैतिक संघर्षात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Pakistan slammed indias remark on removing control over pok calling it an international dispute nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • india
  • India pakistan Dispute
  • pakistan
  • Uripok

संबंधित बातम्या

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी
1

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
2

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
3

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे
4

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.