Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Survey on Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू चीन की पाकिस्तान? पाहा जनमताचा कौल

Survey on Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? चीन की पाकिस्तान? या प्रश्नावर देशभरात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 14, 2025 | 09:17 AM
Public opinion after Operation Sindoor Who is India's biggest enemy China or Pakistan

Public opinion after Operation Sindoor Who is India's biggest enemy China or Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

Survey on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील जनतेच्या मनातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? चीन की पाकिस्तान? या प्रश्नावर देशभरात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूर हे भारताने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेले एक निर्णायक लष्करी अभियान होते. या कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेनंतर जनमानसात पाकिस्तानविरोधात संताप उसळला असतानाच, चीनबाबतही वाढत्या संशयाचे स्वर दिसून आले.

युद्धबंदीपूर्वीचा दृष्टिकोन

ऑपरेशन सिंदूरपूर्वी, युद्धबंदीच्या आधी झालेल्या सर्वेक्षणात ४७.४% लोकांनी चीनला भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ओळखले. यामागे सीमेवरील सततच्या घुसखोरी, लडाखमध्ये तणाव, तैवानप्रती चीनचे आक्रमक धोरण आणि जागतिक पातळीवरील रणनीतिक संघर्ष हे महत्त्वाचे मुद्दे होते. २७.७% लोकांनी पाकिस्तानला भारताचा प्रमुख शत्रू ठरवले, तर १२.२% उत्तरदात्यांनी चीन आणि पाकिस्तान दोघांनाही शत्रू म्हटले.

हे देखील वाचा : Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्तेचा महामेरू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज

ऑपरेशन सिंदूर नंतर बदललेले जनमत

ऑपरेशन सिंदूरनंतर, जेव्हा भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला, तेव्हा लोकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. मात्र, तरीही ५१.८% लोकांनी चीनलाच भारताचा मुख्य शत्रू मानले. पाकिस्तानविषयीचा रोष कमी झाला असे नव्हे, पण केवळ १९.६% लोकांनी त्याला भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हटले. यासोबतच, २०.७% लोकांनी चीन आणि पाकिस्तान दोघेही भारतासाठी तितकेच घातक असल्याचे मत व्यक्त केले. ही आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की जनतेच्या मनात पाकिस्तानबाबत तात्कालिक रोष आहे, पण दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टीने चीन अधिक धोकादायक मानला जातो.

पाकिस्तानची मात आणि चीनचा धोका

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. भारताच्या हवाई आणि विशेष दलांच्या कारवाईत दहशतवादी गटांची कंबर मोडण्यात आली. पाकिस्तानने त्यानंतर भारतातील विविध शहरांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सुरक्षादलांनी प्रत्येक वेळी जोरदार प्रत्युत्तर दिले.

विशेष म्हणजे, दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित होते, हे पाकिस्तानच्या आणि दहशतवादाच्या साटेलोट संबंधांचे पुरावे आहेत. दुसरीकडे, चीनबाबत जनतेचा अविश्वास वाढत आहे. तंत्रज्ञान, व्यापार, सीमावाद, तसेच जागतिक दबाव तंत्र यामध्ये चीनने भारताविरोधात उघड भूमिका घेतली आहे. यामुळे भारताचे धोरण ठोस आणि स्वयंपूर्ण करण्याची गरज अधोरेखित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!

 चीन दीर्घकालीन धोका, पाकिस्तान तात्कालिक शत्रू

सर्वेक्षणातून स्पष्ट होते की, पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी भारताचा सक्रिय शत्रू असला तरी, चीनचा धोका अधिक खोल आणि धोरणात्मक आहे. भारताला आता केवळ सामरिक नव्हे, तर कूटनीतिक, आर्थिक आणि तांत्रिक पातळीवरही या दोन्ही शत्रूंना तोंड देण्याची गरज आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धडा दिला असला, तरी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चीनचा छुपा विस्तारवाद अधिक गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने स्वयंपूर्ण लष्करी क्षमता, जागतिक भागीदारी आणि अंतर्गत सुरक्षा यावर भर द्यावा लागणार आहे, हे या सर्वेक्षणाचे महत्त्वपूर्ण संदेश आहे.

Web Title: Public opinion after operation sindoor who is indias biggest enemy china or pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • America
  • China
  • international news
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
3

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
4

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.