Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना भारत मदत करणार नाही; असं का म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर? जाणून घ्या!

भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी 4.5 अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला श्रीलंकेच्या कर्जाच्या पुनर्रचनेसाठी समर्थन पत्र सादर करणारा भारत हा पहिला देश ठरला

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 22, 2023 | 12:10 PM
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना भारत मदत करणार नाही; असं का म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर? जाणून घ्या!
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : पाकस्तानची सध्याची अवस्था काय झालीये हे संपुर्ण जग पाहात आहे. पाकिस्तानाता मोठं आर्थिक संकट आलं आहे. दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले असताना पाकिस्तानला आता IMF कडे हात पसरत असताना आता पाकिस्ताच्या मदतीला कोण करतय याकडे संपुर्ण जगाच लक्ष लागलेलं आहे. अशातच आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar)यां नी पाकिस्तानच्या मदतीबाबत स्पष्टोक्त विधान केले आहे. (India Help To Pakistan) ते म्हणाले की, भारत पाकिस्तान संबध कसे आहेत ते जगजाहीर आहे.  असं असताना दहशतवाद आणि त्याचा द्विपक्षीय संबध  याचाही त्यांनी उल्लेख केला.  तर,  पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे त्याच्या स्वतःच्या कृतीवर ठरत असल्याचही ते म्हणाले. 

[read_also content=”‘या’ कारणामुळे भारताचे चीनशी संबंध चांगले नाहीत; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं https://www.navarashtra.com/world/s-jaishankar-clearly-said-about-why-india-dont-have-good-relation-with-china-nrps-371454.html”]

भारत-श्रीलंका संबंध वेगळे 

जयशंकर यांनी श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, भारताचे श्रीलंकेसोबतचे संबंध खूप वेगळे आहेत. ते म्हणाले की मला वाटते की पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे पाकिस्तानच्या कृती आणि पाकिस्तानच्या निवडींवर ठरते. कोणीही अचानक आणि विनाकारण कठीण परिस्थितीत येत नाही. त्यातून मार्ग काढणे त्यांच्यावर अवलंबून आहे. आज आमचे नाते असे नाही की जिथे आपण त्या प्रक्रियेशी थेट संबंधित असू शकतो.

पाकिस्तानला मदत करण्यास भारताचा नकार 

जयशंकर यांनी श्रीलंकेप्रती सद्भावना आणि पाकिस्तानप्रती लोकांच्या भावनांचा उल्लेख केला. इस्लामाबाद भारतात सीमेपलीकडील दहशतवादाला प्रायोजित करत आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, भारत आपल्या शेजाऱ्यांना अडचणीच्या वेळी मदत करण्यास तयार आहे. उदाहरणार्थ, जर मी त्याची श्रीलंकेशी तुलना केली तर ते खूप वेगळे नाते आहे. श्रीलंकेसोबत या देशात अजूनही खूप सद्भावना आहे. भारतातील पाकिस्तानबद्दलच्या भावनांचा उल्लेख केला जयशंकर म्हणाले की, साहजिकच शेजार्‍यांच्या काळजी आणि चिंता असतात पण त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण मदत केली पाहिजे अशी भावना देखील आहे. उद्या दुसऱ्या शेजाऱ्याला काही झाले तर तेच होईल. पण पाकिस्तानबद्दल देशात काय भावना आहे हे तुम्हाला माहीत आहे. भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी 4.5 अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. गेल्या महिन्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला श्रीलंकेच्या कर्जाच्या पुनर्रचनेसाठी समर्थन पत्र सादर करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. 

Web Title: What jaishankar said about india help pakistan in economic crisis n rps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2023 | 11:55 AM

Topics:  

  • China
  • pakistan
  • pakistan economic crisis
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
3

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
4

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.