
बहुतेक वाहनधारक उन्हाळा सुरू झाला की कार एसीच्या सर्व्हिसिंगसाठी पळापळ करतात. पण खरं सांगायचं तर, कार एसीची खरी वाट उन्हाळ्यात नाही, तर पावसाळ्यात लागलेली असते! पावसाळ्यातील चिखल, दूषित पाणी आणि हवेतील ह्युमीडीटी यामुळे एसी सिस्टीमवर प्रचंड ताण पडतो. म्हणूनच, पावसाळा संपताच कार एसीची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले, तर पुढच्या उन्हाळ्यात तुमचा एसी अचानक दगा देऊ शकतो. पावसाळ्यानंतर एसी सर्व्हिसिंग का करावी, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत,
बुरशी आणि बॅक्टेरियाचा विळखा
पावसाळ्यात हवेतील दमटपणा मुळे एसीच्या डक्ट्स आणि इव्हॅपोरेटर कॉईलवर बुरशी जमा होते. यामुळे कार सुरू केल्यावर कुबट वास येतो. ही दूषित हवा श्वसनाचे आजार निर्माण करू शकते.
कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
चिखल आणि कचऱ्यामुळे ब्लॉक होणारे कंडेंसर
कारचा एसी कंडेंसर हा सहसा पुढच्या बंपरच्या मागे असतो. पावसाळा आणि रस्त्यावरील चिखल, कचरा आणि घाणेरडे पाणी थेट त्यावर उडते. हा चिखल वाळल्यानंतर कंडेंसरचे जाळे ब्लॉक होते, ज्यामुळे एसीला उष्णता बाहेर टाकणे कठीण जाते आणि कुलिंग कमी होते.
कॅबिन फिल्टर जाम होणे
हवेतील ओलाव्यामुळे एसीचा कॅबिन फिल्टर ओलसर होतो आणि त्यावर धूळ बसून तो पूर्णपणे चोक-अप होतो. यामुळे एसीची हवा कमी होते आणि इंजिनवर लोड आल्याने मायलेज घटते.
इलेक्ट्रिक कार च्या AC मध्ये हा असतो मोठा फरक इतर गाड्यांपेक्षा..! जाणून घ्या
गंज आणि गॅस लीकचा धोका
चिखल आणि पाणी साचून राहिल्याने एसीच्या ॲल्युमिनियम पाईप्सना गंज चढू लागतो. यामुळे सूक्ष्म छिद्रे पडून ‘एसी गॅस लीक’ होण्याची शक्यता वाढते.
मोठा खर्च कसा टाळाल?
पावसाळ्यानंतर जर तुम्ही फक्त फिल्टर क्लिनिंग, कंडेंसर वॉश आणि डक्ट सॅनिटायझेशन करून घेतले, तर केवळ काही रुपयांत काम होते. पण हाच कचरा तसाच राहिला, तर उन्हाळ्यात कंप्रेसर फेल्युअर किंवा कंडेंसर बदलण्याचा हजारो रुपयांचा मोठा फटका बसू शकतो.