
कार खरेदीदारांना मोठा झटका! 'या' तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार (Photo Credit- X)
नियामक फायलिंगमध्ये मारुति सुझुकीने दरवाढीचे मुख्य कारण स्पष्ट करताना सांगितले की, “कार उत्पादनासाठी लागणाऱ्या इनपुट खर्चामध्ये (कच्चा माल आणि परिचालन खर्च) सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाचे वाढते दर आणि ऑटोमोबाईल उद्योगासमोरील आव्हाने पाहता, जून २०२६ पासून कंपनीच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३०,००० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे.”
Maruti Suzuki to hike prices across models by up to Rs 30,000 from June 2026: Co filing. pic.twitter.com/lt91tCq79p — Press Trust of India (@PTI_News) May 21, 2026
कंपनीने पुढे सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर पडू नये म्हणून कंपनीने बरीच आर्थिक झळ स्वतः सोसली. मात्र, आता महागाईचा दबाव कमालीचा वाढल्याने अंशतः दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे.”
नवीन ड्रायव्हर असाल तर गाडी चालवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर बाराच्या भावात जाल!
मारुति सुझुकीने स्पष्ट केले आहे की, ३० हजार रुपयांची ही दरवाढ कमाल मर्यादा असेल. याचा अर्थ असा की, कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्स (उदा. अल्टो, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा किंवा ग्रँड विटारा) आणि त्यांच्या इंजिन किंवा इंधन प्रकारानुसार (पेट्रोल, सीएनजी) ही वाढ वेगवेगळी असणार आहे. बेस मॉडेल्सच्या किमती कमी वाढतील, तर प्रीमियम आणि टॉप-एंड गाड्यांच्या किमतीत जास्त वाढ पाहायला मिळू शकते.
मारुति सुझुकीने केलेली ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा देशातील बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे त्रस्त आहेत. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी यापूर्वी अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचे दर वाढवले आहेत. याआधी, चालू वर्षात ६ एप्रिल रोजी प्रमुख वाहन उत्पादक कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने देखील आपल्या एसयूव्ही (SUV) आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली होती. महिंद्राने इनपुट खर्च वाढल्याचे सांगत वाहनांच्या दरात सरासरी १.६ टक्के ते कमाल २.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आता मारुतीच्या या घोषणेनंतर आगामी काळात इतर कार कंपन्याही आपल्या गाड्यांचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !