
Maruti Suzuki,
भारतासह जगभरात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India) आता भारतात एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात वाहनाच्या विक्रीचे उच्चांक मोडणाऱ्या मारुती सुझुकीने यावेळी आगळावेगळा विक्रम बनवला आहे. साधारणपणे रस्तेमार्गावरून वाहनांची वाहतूक करणाऱ्या या कंपनीने भारतात रेल्वेमार्फत तब्बल ३० लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक केली आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात त्यांनी कार वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून हा टप्पा त्यांच्या “ग्रीन लॉजिस्टिक्स” या मोहिमेतील महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘२०१४-१५ या आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण वाहन वाहतुकीपैकी फक्त ५% वाहतूक हि रेल्वेमार्फत होत होती. मात्र, २०२५-२६ पर्यंत हा एकदा २६.५% पर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे अवघ्या २१ महिन्यांच्या कालावधीत २० लाखांवरून ३० लाख वाहनांच्या रेल्वे वाहतुकीचा टप्पा कंपनीने गाठला आहे.
यावेळी बोलताना मारुती सुझुकी इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO हिसाशी टाकेउची यांनी संगितले कि, “रेल्वे वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. इंधनाची बचत होते. तसेच, रस्त्यांवरही ट्रॅफिकही कमी होतो. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि अदाहक कार्यक्षम लॉजिस्टिकस प्रणाली उभारण्यावर कंपनीचा भर आहे,” असे ते म्हणाले. या उद्देशासाठी कंपनीने सुमारे ११,३७२ कोटींची गुंतवणूक ग्रीन लॉजिस्टिकस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली आहे. यात गुजरातमधील हंसलपूर आणि हरियाणातील मानेसार येथील उत्पादन प्रकल्पांमध्ये रेल्वे सायडिंग, लॉजिस्टिकस हब, विशेष वाहतूक रेल्वे रेक्स आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स
कंपनीचे पुढील लक्ष २०३०-३१ पर्यंत रेल्वेमार्फत होणाऱ्या वाहन वाहतुकीत ३५% पर्यंत वाढ करण्याचे आहे. यासाठी हरियाणातील खारखोडा येथे नवीन रेल्वे सायडिंग उभारण्याची योजना देखील कंपनीने जाहीर केली आहे. ही कामगिरी थेट कार विक्रीशी संबंधित नसली तरी भारतातील वाहन उद्योग अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक वाहतूक व्यवस्थेकडे वळत असल्याचे यामुळे स्पष्ट होते. Maruti Suzuki India सध्या भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून ती देशभरात लाखो वाहने विकते.
Maruti Suzuki India हि भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून हि कंपनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या, चांगल्या मायलेज देणाऱ्या तसेच कमी मेंटेनन्स असणाऱ्या गाड्या उपलब्ध करून देते. मारुती सुझुकीची खासियत म्हणजे यांच्या कार्स या ‘मिडल क्लास फॅमिली कार्स’ म्हणून लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकीच्या स्विफ्ट, बॅलेनो, वॅगन आर, अल्टो, ब्रेझ्झा, डिझायर आणि एर्टिगा या कार्स भारतीय बाजारात खूप लोकप्रिय असून त्यांना प्रचंड मागणी आहे. मारुती सुझुकीचे भारतात लोकप्रिय होण्याचे आणखी कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे दर, ग्रामीण भागातही उपलब्ध असे सर्व्हिस सेंटर्स तसेच कमी मायलेज हे आहेत. कंपनी आता हायब्रीड कार्स, सीएनजी गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या तसेच ग्रीन लॉजिस्टिकस यावर जास्त लक्ष देत आहेत.
मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…