Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!

गेल्या वर्षी दुष्काळाचे संकट झेललेल्या राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर यावर्षी आणखी एक संकट उभे ठाकले आहे. बांगलादेशात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे संत्रा निर्यातीचे संकट उभे राहिले आहे. उत्पादित संत्र्याचे नेमके काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 13, 2024 | 02:45 PM
बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!

बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यात प्रामुख्याने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते. बांगलादेशमधून या संत्र्यांला मोठी मागणी असते. दर हंगामात बांगलादेशला अडीच लाख टन संत्र्याची निर्यात होते. पण आता बांगलादेशमधील राजकीय पेचप्रसंगामुळे संत्र्यांची निर्यात थांबली आहे. याचा राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे विदर्भातून बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचे यावर्षी काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.

शेतकऱ्यांसह निर्यातदारही चिंतेत

बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे संत्रा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी आणि निर्यातदार सध्या चिंतेत पडले आहेत. बांगलादेशमध्ये गेले काही वर्षं सातत्याने विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत होती. गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेशमध्ये विदर्भातील संत्र्याची मागणी कमी झालेली नव्हती.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!

त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता बांगलादेशमधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

नवीन बाजारपेठ शोधण्यास सरकारने पुढे यावे

यावर्षीच्या हंगामातील संत्रा ऑक्टोबर महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे यंदा संत्र्याचा बहारही चांगला असल्याने, दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांकडून करण्यात येत आहे.

चीन, आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी प्रयत्न करावेत

राजकीय पेचप्रसंगामुळे बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतो. असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकत्रित प्रयत्न करून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येऊ घातलेल्या संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Bangladesh crisis hits orange growers orange export stopped farmers and exporters worried

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Bangladesh News
  • Nagpur

संबंधित बातम्या

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा
1

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा
2

‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी
3

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
4

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.